Skip to main content

Posts

Showing posts with the label Diwali

दिवाळीत लहान मुलं एकत्र जमून किल्ला का बनवतात ?

दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, शाळेला सुट्टी, नवीन कपडे आणि किल्ला या सार्‍या गोष्टी आठवतात ना तुम्हाला. पण तुम्हाला माहितेय का ? दिवाळीत लहान मुलं एकत्र जमून किल्ला का बनवतात ? कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. लहानपणी किल्ला करताना हे सारे प्रश्न पडायचे. पण उत्तर मात्र मोठे होताना सापडलं. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड या सार्‍यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपला भारत, आपला महाराष्ट्र गुलामगिरीत जगत होता , सुराज्य हे फक्त स्वप्न बनून राहिले होते तिथे कसले आले सण आणि कसला उत्साह. हा उत्साह , विश्वास देण्याच काम केल स्वराज्याने. शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या स्वराज्यात स्वातंत्र्य होत. लोकांना सुरक्षितता होती आणि शोषण थांबल होत. लोक खरोखर सुराज्य , रयतेच राज्य स्वप्नाच्या जगातून प्रत्यक्षात उतरलेलं बघत होते. त्यानंतरच दिवाळीला खरा अर्थ प्राप्त झाला . स्वाभिमान जागृत झालेली मानस आता गुलामीतून बाहेर...