गणपतीला दुर्वा का आवडतो ? अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो सर्व त्रैलोक्यालाच अतिशय त्रास देत असे. देवांना तर फारच छळीत असे. सर्व देव हैराण झाले आणि गणपतीला शरण गेले. गणपती हा महाकाय! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असे त्याचे वर्णन आपण करतोच. अशा महाकाय गणपतीने त्या अनलासुरला चक्क गिळूनच टाकले. पण अनल म्हणजे अग्नी. हा असुर एक प्रकारे अग्नीचेच रूप होता. त्याला गिळून टाकल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली आणि त्याचा गणपतीला खूप त्रास होऊ लागला. आपल्याला संकटमुक्त करण्यासाठी गणपतीने अनलासुराला गिळून टाकले आणि तो स्वतःच त्रासात सापडला, हे समजल्यानंतर देव, ऋषी, मुनी या सर्वाना त्यांना जमतील ते उपचार सुरु केले. कुठूनतरी गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरु झाले. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला. नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र त्याचा मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होईना. ब्रम्हदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्य...