Skip to main content

Posts

Showing posts with the label History

मूर्तिभंजन आणि मंदिरविध्वंस

मूर्तिभंजन आणि मंदिरविध्वंस इस्लामी राजवटींचे मुख्य वैशिष्ट्य होते मूर्ती फोडणे आणि देवळे पाडणे. त्यांचे अनुकरण भारतातील इस्लामी राज्यकर्त्यांनी कसे केले याची काही उदाहरणे पुढे देतो. मुहम्मद घोरीने ११९२ साली पृथ्वीराज चौहानाचा पराभव करून त्याला ठार मारले. त्यानंतर आपला गुलाम कुत्बुद्दीन ऐबक याला भारतात ठेवून घोरी गझनीला परत गेला. घोरी मेल्यावर कुत्बुद्दीन ऐबकच इथला सुलतान झाला. या कुत्बुद्दीन ऐबकाने मुहम्मद घोरीच्या आज्ञेवरून दिल्लीत एक मोठी मशीद बांधली. सत्तावीस बुतखान्यांचे म्हणजे मूर्तिमंदिरांचे साहित्य वापरून ती मशीद बांधली आहे असा फार्सी शिलालेखच तिच्यावर आहे. आता ती मशीद पडक्या अवस्थेत आहे आणि पुरातत्त्वखात्याच्या ताब्यात आहे. आजही तिथे हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष पहायला मिळतात. कुत्बुद्दीन ऐबकच्याच काळात मुहम्मद बख्तियार खिलजी या त्याच्या सरदाराने १२०२ मध्ये बिहारमधील एक मोठा बौद्ध विहार पाडून टाकला आणि तिथल्या बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. ती सर्व हकीगत तत्कालीन इतिहासकार मिन्हाजुद्दीन याने तबकात-इ नासिरी या त्याच्या फार्सी ग्रंथात लिहून ठेवली आहे. त्याच सुमाराला प्...

टपाल पेटीचा इतिहास / History Of Letterbox

टपाल पेटी  - भारतात १७६६ साली लॉर्ड क्लाइव्हने फक्त सरकारी कामकाजाकरिता टपाल सेवा सुरू केली. आधुनिक टपाल सेवा आम जनतेसाठी १८३७ साली खुली करण्यात आली. १५८२ मध्ये पहिले टपाल तिकिट (पोस्टाचे तिकिट) कराची येथे जारी करण्यात आले, तथापि ते केवळ सिंध प्रांतापुरतेच मर्यादित होते. १८५४ मध्ये टपाल विभाग स्थापन करण्यात आला, त्या सुमारास देशात सु. ७०० टपाल कचेऱ्या (डाकघरे) कार्य करीत होत्या. १८८० साली धनप्रेष सेवा (मनीऑर्डर सेवा) चालू करण्यात आली. १८८२ हे वर्ष म्हणजे भारतीय टपाल कार्यालयाच्या कारकीर्दीतील अतिमहत्त्वाचे वर्ष मानले पाहिजे कारण त्या वर्षी डाकघर बचत बँकेने सबंध देशभर कार्य करण्यास प्रारंभ केला. १९८३ साली भारतीय टपाल व तार विभागाने डाकघर बचत बँकेची शताब्दी साजरी करण्यास प्रारंभ केला. रेल्वे-डाक-सेवा व हवाई-डाक-सेवा अनुक्रमे १९०७-१९११ साली सुरू झाल्या. तेव्हापासून आतापर्यंत टपालयंत्रणेत लक्षणीय प्रगती झाल्याचे आढळते. १९५१ ते १९८१ या अवधीत डाकघरे कार्यालयची संख्या चौपाटीने वाढली.  सन्दर्भ : मराठी विश्वकोश Instagram - ©TRAVELWALA.CHORA

१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव ( जयस्तंभ )

सदर पुस्तकाच्या नावातूनच पुस्तकाचा आशय कळून येतो. पण लेखकांच्या 'वास्तव' शब्दाचा अर्थ आत्ता 'विस्तव' म्हणून घेतल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण काही समाजकंटकांकडून सारखा हा विस्तव भडकवला जात आहे.  इतिहास अशी गोष्ट आहे, जिथे 'ध चा मा' झाला तरी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य संपते. म्हणून तत्कालीन कागदपत्रे, शिलालेख, झालेला पत्रव्यवहार यांवरच इतिहास अभ्यासला जातो. पण वाईट गोष्ट अशी की, असा इतिहास अभ्यासणाऱ्याला सध्या फक्त ट्रोल केले जाते. आपले अज्ञान आणि असत्याचा प्रोपोगंडा हीच याची कारणे देता येतील.  कोरेगाव भीमा, भीमा नदीच्या काठावर असलेले एक खेडे म्हणून या गावाला 'कोरेगाव भीमा' नाव मिळाले. पुढे याच गावच्या हद्दीत एक चकमक झाली, त्याला लढाई संबोधले गेले. ही लढाई होती मराठा विरुद्ध इंग्रज... इंग्रजांनी संपूर्ण भारत ताब्यात घेतल्यानंतरही फक्त मराठे त्यांना विरोध करत होते, हे सर्वश्रुत आहे. पण मराठ्यांमधील अंतर्गत वादात इंग्रजांनी मध्यस्ती करण्याच्या बहाण्याने हळू हळू मराठी सत्ता खिळखिळी करून टाकली. अशीच एक कोरेगावची लढाई.  ३१ डिसेंबर १८१७ रोजी मराठा गादी...

अदालतवाडा ( अदालत राजवाडा ), सातारा / Adalatwada ( Adalat Rajwada ), Satara

अदालतवाडा ( अदालत राजवाडा ) छत्रपती संभाजीमहाराजांनंतर राजाराममहाराजांना जिंजीस जावे लागले व महाराणी येसूबाई यांना आपले नऊ वर्षांचे पुत्र शाहूराजे यांच्यासह औरंगजेबाची कैद पत्करावी लागली. पुढे सन १६९९ मध्ये ( जून ) राजाराममहाराज साताऱ्यास आले व त्यांनी आपली नवी राजधानी सातारा झाल्याचे जाहीर केले. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजे कैदेतून सुटले ( सन १७०८ ) व साताऱ्यास येऊन सातारा येथे आपला राज्याभिषेक केला. सातारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा हे लहानसे खेडे होते. राजधानीचे ठिकाण झाल्यावर शाहूराजांनी त्याचा विकास केला. त्याच वेळी त्याचे नामकरण शाहूनगर असे करून तेथे काही वाडे बांधले. त्यांपैकी अदालतवाडा व इतर काही वास्तूंचे अवशेष आज साताऱ्यात पाहावयास मिळतात. सातारा किल्ल्याच्या माचीला अदालतवाडा ही वास्तू आजही मोठ्या दिमाखाने उभी आहे. छत्रपती शाहूमहाराजांनी आपले प्रशासन जेव्हा साताऱ्यात सुरू केले, तेव्हा न्यायनिवाडे करण्यासाठी व इतर शासकीय कामांसाठी हा वाडा बांधण्यात आला. १० फूट उंचीच्या जोत्यांवर उभा असलेला ६७ मीटर लांब व ४८ मीटर रुंद असा हा वाडा जवळजवळ ३०० वर्षे अभेद्य ...

हरिश्चंद्रगड / Harishchandragad

निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व, अनेक मूर्त्या, कोरीव लेण्या आणि मंदिर - या सर्व गोष्टींनीं परिपूर्ण असलेला सह्याद्री पर्वत रांगातील एक दुर्गम डोंगर म्हणजे " हरिश्चंद्रगड " - पौराणिक महत्व  हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींचे नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुना हरिश्चंद्रेश्वर शिवमंदिर आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत 'चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात. ' शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश...

सारसबाग , पुणे / Sarasbaug , Pune

सारसबाग , पुणे   शहरातल्या सर्वाधिक वर्दळीच्या परिसरात असूनही जिचे आकर्षण आजतागायत कायम आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची पावले जिथे पडतात, ती म्हणजे सारसबाग. पुण्याच्या इतिहासप्रसिद्ध ठिकाणांमध्ये सारसबागेला पुण्याची शान म्हटल्यास नक्कीच ते वावगे ठरणार नाही. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श...

मस्तानी तलाव , पुणे / Mastani Lake , Pune

मस्तानी तलाव , पुणे  पुणे शहराच्या आजूबाजूला अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी कायम खुणावत असतात. पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळ असाच एक ठिकाण आहे, ज्याला ' मस्तानी तलाव ' या नावानं ओळखलं जातं. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्‍नी मस्तानी हिचे नाव देण्यात आले आहे.  दिवे घाटाच्या पायथ्याशी बांधलेला हा तलाव आजही आपल्या इतिहासाच्या खुणा जपून आहे. सध्या रस्ता झाल्याने जाणे देखील सुकर झाले आहे, त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही उत्तम पर्याय आहे. तसे पहायला गेले तर हे पेशवे काळातील एखादे छोटे धरण असावे कारण याची नीट रचना आपण पाहिली तर याला एक बंधारा आपल्याला पहायला मिळतो. दिवे घाटाच्या डोंगरातून पावसाचे पाणी येऊन हे सगळे पाणी या बंधाऱ्यामध्ये साठवले जाते. या बंधाऱ्याला सुंदर कामान देखील आहे. साधारणपणे जवळपास ६ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास १५ फुट आहे . तलावाच्या इथे आपल्याला एक भू...

श्री संगमेश्वर मंदिर , सासवड / Shree Sangameshwar Temple , Saswad

संगमेश्वर मंदिर , सासवड   पुण्यापासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर , सासवड गावात संगमेश्वर हे पांडवकालीन स्वंयभू महादेवाचे मंदिर आहे. कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे. मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दृष्टिस पडतो तो स्थापात्य आणि शिल्प कलेचा अदभुत नजारा. तीस दगडी खांबावर उभारलेला प्रवेश मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या दीपमाळा, प्रवेश मंडपातील नंदी, मंदिरातील कोरीव कासव, मंदिरावरील सुबक नक्षीकाम नजरेत साठवून ठेवावसं वाटतं. प्रवेश मंडपाच्या दक्षिणोत्तर प्रवेश दार आहेत. विशेष म्हणजे या मंदिरातील नंदिचे तोंड पश्चिमेस आहे. मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. ७ ते ८ फुट उंचीच्या या तुळशीवृंदावनात वर तुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया. तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते. मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळी च्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.

बैडमिंटन के इतिहास से पुणे का क्या नाता है ?

बैडमिंटन के इतिहास से पुणे का क्या नाता है ? बैडमिंटन की शुरुआत 19वीं सदी के मध्य में ब्रिटिश भारत में मानी जा सकती है, उस समय तैनात ब्रिटिश सैनिक अधिकारियों ने इसकी सुरुवात की थी। ब्रिटिश छावनी शहर पुणे  में यह खेल खासतौर पर लोकप्रिय रहा, इसीलिए इस खेल को पूनाई   के नाम से भी जाना जाता है। शुरू में, हवा या गीले मौसम में उच्च वर्ग के ऊन के गोले से खेलना पसंद करते थे, लेकिन अंततः शटलकॉक ने बाज़ी मार ली। इस खेल को सेवानिवृत्ति के बाद वापस लौटनेवाले अधिकारी इंग्लैंड ले गए, जहां इसे विकसित किया गया और नियम बनाये गए। सन् 1860 के आस-पास, लंदन के एक खिलौना व्यापारी इसहाक स्प्राट ने बैडमिंटन बैटलडोर- एक नया खेल नामक एक पुस्तिका प्रकाशित की, लेकिन दुर्भाग्य की बात है कि उसकी कोई प्रति नहीं बच पायी. नया खेल निश्चित रूप से सन् 1873 में ग्लूस्टरशायर स्थित ब्यूफोर्ट के ड्यूक के स्वामित्ववाले बैडमिंटन हाउस में शुरू किया गया था। उस समय तक, इसे "बैडमिंटन का खेल" नाम से जाना जाता था और बाद में इस खेल ...

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Veer Mavala - Shiva Kashid / वीर मावळा - शिवा काशीद

वीर मावळा - शिवा काशीद शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते . त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले , म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजीराजांसारखे दिसत असत . त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता . त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनीपालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना , शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले . मात्र , हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खूपसली . ही घटना १२ - १३ जुलै १६६० या दिवशीघडली . या शिवा काशीद नावाच्या मर्द मावळ्याची दुरवस्थेतील समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी , विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी आहे . नेबापूरच्या ( चव्हाण ) " पाटलांनी " शिवा काशिदांना प्रति शिवाजी महाराज बनण्याची कल्पना दिली होती . ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेबापूर ( चव्हाण ) पाटील आणि शिवा काशीद यांनी शिवाज...