Skip to main content

Posts

Showing posts with the label Hanuman

मारुतीचे (हनुमंताच्या) मूर्तीचे प्रकार !

टीप : वरील वीर मारुतीची मूर्ती AI द्वारे निर्मित आहे. या AI निर्मित मूर्तीचा उद्देश केवळ माहिती देण्यापुरता आहे. मारुती ( हनुमान ) म्हणजेच शक्ती, भक्ती आणि धैर्याचे प्रतीक. विविध रूपांमध्ये हनुमानाचे कार्य आणि त्याचे महत्त्व लक्षात घेतल्यास, त्याचे प्रत्येक रूप वेगळे आणि महत्त्वपूर्ण आहे असे जाणवते. हनुमानाचे काही विशेष रूपे आणि त्यांचे महत्त्व आज आपण जाणून घेऊया. मारुतीचे अर्थात हनुमंताच्या मूर्तीचे एकूण दहा प्रकार आहेत. १) चपेटदान मारुती २) वीर मारुती ३) दास मारुती ४) प्रताप मारुती ६) मिश्र मूर्ती ७) योगी मारुती ८) वार्ताहर मारुती ९) वीणा पुस्तकधारी मारुती १०) पंचमुखी मारुती १. चपेटदान मारुती हनुमानाने अशोकवाटिकेच्या विध्वंसासाठी राक्षस स्त्रियांना पराभूत करताना आपले शरीर आकारमान बदलले होते. त्याच्या हातात एक मोठा वृक्ष असतो, आणि त्याच्या उजव्या हातात चापट मारण्याचा आविर्भाव असतो, म्हणून याला 'कानफाडया मारुती' असेही म्हटले जाते. २. वीर मारुती यामध्ये हनुमान वीरासनात बसलेला असतो, ज्याच्या डाव्या हातात गदा असते आणि उजवा हात हा अभयमुद्रेत असतो. वीरमारुतीची शेपटी वर ...

जिलब्या मारुती मंदिर, शुक्रवार पेठ ( पुणे ) / Jilbya Maruti Mandir, Shukrawar Peth ( Pune )

जिलब्या मारुती मंदिर, शुक्रवार पेठ - पुणे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट, "जिलब्या गणपती” हे सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. आजच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आताच्या मंडई शनिपार रोडवर सुमारे २५० ते ३०० वर्षापुर्वी आंबील ओढा वाहत होता. आंबील ओढ्याचा प्रवाह, भाऊ महाराज बोळाच्या पश्चिमेकडून जिलब्या मारुतीजवळून पुढे जोगेश्वरी देवळाजवळून शनिवारवाड्याच्या पश्चिमेने पुढे जात अमृतेश्वराच्या देवळापाशी नदीला मिळत असे. ह्याच ओढ्याकाठी मंडई शनिपार रोडवर पुर्वी एक स्मशान होते. तिथे एक मारुतीचे छोटस देऊळ होते ( जिलब्या मारुती मंदिर ). त्याला पुर्वी विसावा मारुती म्हणत. कारण लोक त्या ठिकाणी कायमचा विसावा घेत. पूर्वी पती निधनानंतर सती जाण्याची पद्धत होती. यामुळे स्वर्गारोहणाचे पुण्य लाभते, असे समज रूढ होता. अशा सती गेलेल्या स्त्रियांची वृंदावने आठवण म्हणून बांधत. ह्या मारुती मंदिराशेजारी सरदार शितोळे घराण्यातील एक स्त्री सती गेली होती, तिचे स्मारक आहे. पुढे पेशवाईत वस्ती वाढु लागल्यावर इ. स. १७३० च्या सुमारास नाना साहेब पेशवे यां...

हनुमंतांला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा कशी सुरु झाली ?

हनुमंतांला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा कशी सुरु झाली ? ज्ञान, बुद्धी, शिक्षण, पराक्रम, नम्रता, लीनता, भक्तिभाव आणि सामर्थ्यासह अनेक गुण हनुमंतांच्या ठायी दिसून येतात. हनुमंतांना शेंदूर अर्पण करण्याची प्रथा प्रचलित असल्याचे दिसून येते. मात्र, ही प्रथा सुरू होण्यामागे नेमके काय कारण घडले? मारुतीरायाला शेंदूर का अर्पण केला जातो? जाणून घेऊया... हनुमानाला शेंदूर वाहण्यामागे रामायणातील एक प्रसंग कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकदा सीता देवी साजश्रुंगार करत होत्या. त्याचवेळेस हनुमान तिथे पोहोचले. सीता मातेला नमस्कार केला. सीता मातेची सात्विकता हनुमंतांना अतिशय भावली. साजश्रुंगार झाल्यावर सीताने भांगेमध्ये शेंदूराची लकीर ओढली. ते पाहून हनुमंताने कुतुहलाने विचारले, माते, हा सुद्धा तुमच्या श्रुंगाराचा एक भाग आहे का?, त्यावर हसून सीता माता म्हणाली की, हनुमंता, बाकीचे अलंकार नसले तरी चालतील, परंतु हा सर्वात महत्त्वाचा सौभाग्यलंकार आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी भांगात शेंदूराची रेघ ओढतात. सीता मातेने दिलेल्या उत्तरावर प्रतिक्रिया देत हनुमान म्हणाले की, पतीला दीर्घायुष्य, म...

गडावर हनुमानाची मूर्ती का असते ?

गडावर हनुमानाची मूर्ती का असते ? वायूप्रमाणेच हनुमानाची गती, तेज व त्वरा आहेत. तो पर्वतप्राय प्रचंड रूप धारण करू शकतो; यथेष्ट रूप धारण करण्याचा त्याचा हा गुण तर खास यक्षवंशीय गुण आहे. नंतरच्या काळात हा पूर्वीचा यक्ष- हनुमान रामकथेशी जोडल्यामुळे आदर्श रामभक्त म्हणून जनमानसात रूढ झाला. हनुमान शेंदूरलिप्त, रक्तवर्ण, भुतांचा स्वामी, रोगांपासून वाचविणारा, संततिदायक असल्याने गावात याचे स्थान पाण्याजवळ, पिंपळाखाली पारावर किंवा वेशीजवळ आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे. हे सैन्य ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अष्टौप्रहर डोळ्यात तेल घालून पहारा देत असे. रात्री-अपरात्री गडावर वावरणाऱ्या या मावळ्यांना तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी हनुमंताचा मोठा आधार वाटायचा. गावोगावच्या वेशींचे रक्षण करणारा हा देव आपले गडावरही रक्षण करेल, अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यामुळे १६-१७ व्या शतकात मराठय़ांचे प्राबल्य असलेल्या गडांवर हनुमंताची मंदिरे वा घुमटय़ा स्थापन केलेल्या आपणास आढळतात. त्या वेळच्या रयतेच्या म...