Skip to main content

Posts

Showing posts with the label Mahadaji Shinde

महादजी शिंदे / Mahadaji Shinde

अलिजाबहाद्दर महादजी शिंदे महादजी शिंदे यांच्या कार्यकतृत्वास प्रारंभ होण्यापूर्वीच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढीत आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला. त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना म्हणजे पानीपतचे युद्ध होय. या युद्धात ते स्वत: हजर होते त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचे बंधु तुकोजी व पुतणे जनकोजी शिंदे ठार झाले. पूर्ण शिंदेशाही पथकाचा नाश होऊन मराठ्यांचा पराभव झाला व या युद्धातुन त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेऊन ते परत फिरले. वाटेत त्यांच्यावर प्राणांकीत हल्ला झाला. त्यातून वाचून ते सुखरूप परत दक्षिणेत आले. आधीच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्युचे दुःख, त्यात ते एकटेच कर्तृत्वान पुरूष उरले. त्यामुळे सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यात पेशवे कुटुंबातील संघर्षाचा फटका महादजीस बसला व त्यांच्या दौलती विषयी वाद सुरू झाला. त्यात त्यांची महत्वाची सात वर्ष गेली. तरिही त्यांनी न डगमगता धिराने या दरम्यान स्वत:चे बस्तान बसविले. उज्जैन येथील जहागिरदारीची व्यवस्था लावून सैन्य उभारले पैसा वसुल केला व मल्हारराव होळकरांच्या ...