Skip to main content

Posts

Showing posts with the label इतिहास

टपाल पेटीचा इतिहास / History Of Letterbox

टपाल पेटी  - भारतात १७६६ साली लॉर्ड क्लाइव्हने फक्त सरकारी कामकाजाकरिता टपाल सेवा सुरू केली. आधुनिक टपाल सेवा आम जनतेसाठी १८३७ साली खुली करण्यात आली. १५८२ मध्ये पहिले टपाल तिकिट (पोस्टाचे तिकिट) कराची येथे जारी करण्यात आले, तथापि ते केवळ सिंध प्रांतापुरतेच मर्यादित होते. १८५४ मध्ये टपाल विभाग स्थापन करण्यात आला, त्या सुमारास देशात सु. ७०० टपाल कचेऱ्या (डाकघरे) कार्य करीत होत्या. १८८० साली धनप्रेष सेवा (मनीऑर्डर सेवा) चालू करण्यात आली. १८८२ हे वर्ष म्हणजे भारतीय टपाल कार्यालयाच्या कारकीर्दीतील अतिमहत्त्वाचे वर्ष मानले पाहिजे कारण त्या वर्षी डाकघर बचत बँकेने सबंध देशभर कार्य करण्यास प्रारंभ केला. १९८३ साली भारतीय टपाल व तार विभागाने डाकघर बचत बँकेची शताब्दी साजरी करण्यास प्रारंभ केला. रेल्वे-डाक-सेवा व हवाई-डाक-सेवा अनुक्रमे १९०७-१९११ साली सुरू झाल्या. तेव्हापासून आतापर्यंत टपालयंत्रणेत लक्षणीय प्रगती झाल्याचे आढळते. १९५१ ते १९८१ या अवधीत डाकघरे कार्यालयची संख्या चौपाटीने वाढली.  सन्दर्भ : मराठी विश्वकोश Instagram - ©TRAVELWALA.CHORA

१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव ( जयस्तंभ )

सदर पुस्तकाच्या नावातूनच पुस्तकाचा आशय कळून येतो. पण लेखकांच्या 'वास्तव' शब्दाचा अर्थ आत्ता 'विस्तव' म्हणून घेतल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण काही समाजकंटकांकडून सारखा हा विस्तव भडकवला जात आहे.  इतिहास अशी गोष्ट आहे, जिथे 'ध चा मा' झाला तरी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य संपते. म्हणून तत्कालीन कागदपत्रे, शिलालेख, झालेला पत्रव्यवहार यांवरच इतिहास अभ्यासला जातो. पण वाईट गोष्ट अशी की, असा इतिहास अभ्यासणाऱ्याला सध्या फक्त ट्रोल केले जाते. आपले अज्ञान आणि असत्याचा प्रोपोगंडा हीच याची कारणे देता येतील.  कोरेगाव भीमा, भीमा नदीच्या काठावर असलेले एक खेडे म्हणून या गावाला 'कोरेगाव भीमा' नाव मिळाले. पुढे याच गावच्या हद्दीत एक चकमक झाली, त्याला लढाई संबोधले गेले. ही लढाई होती मराठा विरुद्ध इंग्रज... इंग्रजांनी संपूर्ण भारत ताब्यात घेतल्यानंतरही फक्त मराठे त्यांना विरोध करत होते, हे सर्वश्रुत आहे. पण मराठ्यांमधील अंतर्गत वादात इंग्रजांनी मध्यस्ती करण्याच्या बहाण्याने हळू हळू मराठी सत्ता खिळखिळी करून टाकली. अशीच एक कोरेगावची लढाई.  ३१ डिसेंबर १८१७ रोजी मराठा गादी...

सारसबाग , पुणे / Sarasbaug , Pune

सारसबाग , पुणे   शहरातल्या सर्वाधिक वर्दळीच्या परिसरात असूनही जिचे आकर्षण आजतागायत कायम आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची पावले जिथे पडतात, ती म्हणजे सारसबाग. पुण्याच्या इतिहासप्रसिद्ध ठिकाणांमध्ये सारसबागेला पुण्याची शान म्हटल्यास नक्कीच ते वावगे ठरणार नाही. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श...

श्री संगमेश्वर मंदिर , सासवड / Shree Sangameshwar Temple , Saswad

संगमेश्वर मंदिर , सासवड   पुण्यापासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर , सासवड गावात संगमेश्वर हे पांडवकालीन स्वंयभू महादेवाचे मंदिर आहे. कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे. मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दृष्टिस पडतो तो स्थापात्य आणि शिल्प कलेचा अदभुत नजारा. तीस दगडी खांबावर उभारलेला प्रवेश मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या दीपमाळा, प्रवेश मंडपातील नंदी, मंदिरातील कोरीव कासव, मंदिरावरील सुबक नक्षीकाम नजरेत साठवून ठेवावसं वाटतं. प्रवेश मंडपाच्या दक्षिणोत्तर प्रवेश दार आहेत. विशेष म्हणजे या मंदिरातील नंदिचे तोंड पश्चिमेस आहे. मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. ७ ते ८ फुट उंचीच्या या तुळशीवृंदावनात वर तुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया. तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते. मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळी च्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.

बैडमिंटन के इतिहास से पुणे का क्या नाता है ?

बैडमिंटन के इतिहास से पुणे का क्या नाता है ? बैडमिंटन की शुरुआत 19वीं सदी के मध्य में ब्रिटिश भारत में मानी जा सकती है, उस समय तैनात ब्रिटिश सैनिक अधिकारियों ने इसकी सुरुवात की थी। ब्रिटिश छावनी शहर पुणे  में यह खेल खासतौर पर लोकप्रिय रहा, इसीलिए इस खेल को पूनाई   के नाम से भी जाना जाता है। शुरू में, हवा या गीले मौसम में उच्च वर्ग के ऊन के गोले से खेलना पसंद करते थे, लेकिन अंततः शटलकॉक ने बाज़ी मार ली। इस खेल को सेवानिवृत्ति के बाद वापस लौटनेवाले अधिकारी इंग्लैंड ले गए, जहां इसे विकसित किया गया और नियम बनाये गए। सन् 1860 के आस-पास, लंदन के एक खिलौना व्यापारी इसहाक स्प्राट ने बैडमिंटन बैटलडोर- एक नया खेल नामक एक पुस्तिका प्रकाशित की, लेकिन दुर्भाग्य की बात है कि उसकी कोई प्रति नहीं बच पायी. नया खेल निश्चित रूप से सन् 1873 में ग्लूस्टरशायर स्थित ब्यूफोर्ट के ड्यूक के स्वामित्ववाले बैडमिंटन हाउस में शुरू किया गया था। उस समय तक, इसे "बैडमिंटन का खेल" नाम से जाना जाता था और बाद में इस खेल ...