Skip to main content

Posts

Showing posts with the label Pune History

प्राचीन पुणे / Ancient Pune

प्राचीन पुणे   आपण राहतो ते गाव किती जुने आहे हे प्रत्येक गावकऱ्याने माहिती करून घेतलेच पाहिजे , कारण त्या गावाचा वारसा आपण पिढ्यान्पिढ्या जपतो. जसे एखाद्या देवळात गेल्यावर क्षेत्रमाहात्म्य सांगितले जाते आणि ते आपण भक्तिभावाने ऐकतो , तसेच आपले गाव हे आपल्याच नव्हे , तर आपल्या पूर्वजांचेही कार्यक्षेत्रच. त्या क्षेत्राचा महिमा , त्याचे महत्त्व आणि माहात्म्य आपणालाच माहिती नसेल तर येणाऱ्या पिढ्यांना काय समजणार. म्हणूनच ज्या पुण्यात आपण राहतो , त्या पुण्याची , पुण्याच्या इतिहासाची थोडी माहिती करून घेणे आवश्यक आहे . त्रिखंडात गाजलेले पुणे , जरी पेशव्यांच्या काळापासून भरभराटीला आले असले , तरी पुण्याला प्राचीन इतिहासाचे अधिष्ठान आहे . या इतिहासाची पूर्वपीठिका अगदी प्राचीन काळापासून म्हणजे अश्मयुगापासून आहे. काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेजच्या परिसरात नदीच्या पात्रात अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली , तेव्हा पुण्यात आदिमानवांची वस्ती असावी असा तर्क गृहीत धरून शोध घेण्यास सुरुवात झाली . पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कोरेगावातही अश्मयुगीन हत्यारे व साधने सापडली. काळ्...

महात्मा फुले मंडई , पुणे / Mahatma Phule Mandai , Pune

महात्मा फुले मंडई , पुणे   " पुणे तिथे काय उणे " ही म्हण अगदी सार्थ आहे! काळानुसार सांगायचं तर पाताळेश्वर, कसबा गणपती, जोगेश्वरी, पर्वती, शनिवारवाडा असे जुनेपणाचे टप्पे सांगता येतील. पण पुणेकर मंडईला कधीच विसरू शकणार नाहीत. का तर ती त्यांची अन्नदाता आहे. मंडई होण्यापूर्वी बाजारहाट वगैरे शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरत असे. मंडई नव्हती तेव्हा तिच्या जागी खाजगीवाले यांची चारएक एकर जागा मोकळी पडून होती. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि गरजा ध्यानी घेऊन नगरपालिकेने 1882 साली मंडई उभारण्याचा ठराव केला. त्याला महात्मा फुले, हरि रावजी चिपळूणकर अशा काही सभासदांनी विरोध केला. मंडई उभारणीला अडीच-तीन लाखांचा जो खर्च येईल तो शिक्षणकार्यासाठी खर्च करावा अशी त्यांची भूमिका होती. पण ठराव मंडईच्या बाजूने बहुमताने संमत झाला आणि बांधकामाला सुरुवात झाली. वासुदेव बापूजी कानिटकर या कंत्राटदारांकडे काम सोपवण्यात आले. कानिटकर हे अनुभवी कंत्राटदार होते. त्यांनी पुणे नगर वाचन मंदिर , आनंदाश्रम, फर्ग्युसन कॉलेज अशी " भव्य " कामे त्याआधी केलेली होती. कानिटकर कॉंण्ट्रॅक्ट मिळताच कामा...

Sati Ramabai Peshwa Memorial , Theur / सती रमाबाई पेशवा स्मारक , थेउर

सती रमाबाई पेशवा स्मारक , थेउर पुणे के हड़पसर गांव से २२ किमी की दूरी पर स्थित थेउर गांव में गणेश चिंतामणी मंदिर है। इसी परिसर से १-२ किमी की दूरी पर स्वर्गीय रमाबाई माधवराव पेशवा का स्मारक बनाया गया है। इसी स्मारक के के समक्ष गणेशजी की मूर्ति भी है। स्मारक के दाहिने ओर स्माशन भूमि भी स्थित है। हालाकि इस जगह का ज्ञान काफी कम लोगो को है। यह स्मारक मुला-मुठा नदी के तट पर बनाया गया है। इतिहास रमाबाई पेशवा ( १७५०-१७७२ ) , ( प्रथम ) माधवराव पेशवा की पत्नी थी। उनका विवाह ९ दिसंबर १७५८ को माधवराव पेशवा के साथ पुणे में हुआ था। वह सोलापूर के शिवाजी जोशी की पुत्री थी। वह एक धार्मिक एवं आध्यात्मिक प्रवित्ती वाली महिला थी। वह हमेशा श्रीवर्धन-हरिहरेश्वर जैसे तीर्थयात्राओ पर जाती रहती थी। उन्होने सामाजिक या राजनीतिक मामलों में कभी हस्तक्षेप नहीं किया। वह हमेशा माधवराव के लिए उपवास रखा करती थी। इस दंपति को कोई संतान नहीं थी। १७६६-१७६७ में कर्नाटक अभियान के दौरान वह माधवराव के साथ ही थी। इसी अभियान के दौरान माधवराव के स्वास्थ्य पर भी प्रभाव पड़ने लगा था। ...

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Vishrambaug Wada , Pune / विश्रामबाग वाडा , पुणे

 विश्रामबाग वाड्याचा इतिहास , पुणे  श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांनी हा वाडा सन १८०७ रोजी बांधला. सदाशिव पेठेत ज्या ठिकाणी हा वाडा बांधला आहे त्या ठिकाणी पूर्वी हरीपंत फडके यांच्या मालकीची मोठी बाग होती. ती जागा सन १७९९ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने विकत घेतली आणि पुढे आपल्या निवासस्थानासाठीम्हणून वाडा बांधायला घेतला. या वाड्याच्या बांधकामास सन १८०३ मध्ये सुरुवात झाली व तो सन १८०९ मध्ये संपूर्ण बांधून झाला. या वाड्याच्या बांधकामासाठी २,००,५४० रुपये इतका खर्च आला. शिवाय हौद व मोरी बांधण्यास १४००० रुपये लागले. वाड्याच्या नैऋत्य दिशेस पुष्करणीचा  हौद बांधला त्यास ८५०० रुपये इतका खर्च आला. हा वाडा २६० फूट लांब व ९० फूट रुंद आहे. दुर्दैवाने या वाद्याचा उपभोग बाजीरावास फक्त ८ वर्षे घेता आला. वाड्याच्या पहाऱ्यासाठी जो बंदोबस्त ठेवला जात असे त्यासाठी मासिक खर्च हा ४०० रुपये इतका येत होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये पुणे ताब्यात घेतल्यावर पुढे २ वर्षे या वाड्यास कुलूप होते.त्यांनतर सन १८२१ मध्ये इंग्रज सरकारकडून या वाड्यात संस्कृत कॉलेजची स्थापना करण्यात आली. या संस्...