Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

Gatha Temple , Dehu / गाथा मंदिर , देहु

गाथा मंदिर , देहू देहू में स्थित गाथा मंदिर पुणे के प्रसिद्ध मंदिरों में से एक है। मंदिर के द्वार पर संत तुकाराम महाराज की मूर्ति विराजमान है। लोगों को जो सबसे ज्यादा आकर्षित करता है वह है मंदिर की दीवारों पर संत तुकाराम की सभी गाथाओं / किंवदंतियों / नक्काशियों की नक्काशी, जिन्हें पढ़ना बहुत आसान है। कहा जाता है कि मंदिर में जाने पर कम से कम 3 गाथाएं अवश्य पढ़नी चाहिए। मंदिर इंद्रायणी नदी के तट पर स्थित है। मंदिर का परिसर अत्यंत शांत है। इसके अलावा, कथाओ के अनुसार नदी पर एक ऐसी जगह है जहाँ गाथा तैरती है जिसे याद नहीं किया जाना चाहिए। मंदिर के अंदर फोटोग्राफी की अनुमति नहीं है । यहां तक ​​कि मंदिर की बाहरी वास्तुकला भी आकर्षक है। प्रवेश द्वार के दोनों ओर हाथी की मूर्तियाँ है। देहू एक आध्यात्मिक स्थान है जहाँ संत तुकाराम महाराज का जन्म हुआ था। यह तीर्थ यात्रियों का एक स्थान है। संत तुकाराम महाराज का मंदिर 1723 में बनाया गया था। ऐसा कहा जाता है कि जिस घर में वे निवास करते थे, वह आज भी अस्तित्व में है। देहू के मुख्य आकर्षणों में से एक है पालकी (पालकी) यात्रा। इस यात्रा के दौरान

Samarbhumi Umbarkhind / समरभूमी उंबरखिंड

समरभूमी उंबरखिंड  शिवरायांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी एक महत्वाची लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई. खोपोली पाली रोडवर उंबर गावापासून पुढे उंबरखिंडीचा फाटा लागतो, या फाट्यापासून गाडीने ४ किमी आत गेल्यावर समरभूमी उंबरखिंड स्मारक आहे . इतिहास : इ.स. १६६१ च्या जानेवारीत शाहीस्तेखानाने कारतलबखानाला शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेले उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहीमेवर पाठविले. कारतलबखानाबरोबर, कछप, जसवंत कोकाटे, जाधवराव हे सरदार व रायबाघन ही स्त्री सरदार होती. याशिवाय पायदळ व घोडदळ अंदाजे २०,०००, घोडे, बैल, छोट्या तोफा, बंदूका, डेरे, हत्ती, खजिना असा मोगली सरंजाम होता. खान पूणे, तळेगाव- वडगाव- मळवली मार्गे लोणावळ्याकडे सरकला वास्तविक पाहाता वाटेवरील लोहगड, विसापूर किल्ले स्वराज्यात होते, पण महाराजांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यावरुन खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण उंबरखिंडीत खानाला कोंडीत पकडून झोडपून काढणे शक्य होते. महाराजांनी नेताजीला खानाच्या वाटेवरील पाणवठ्यांची, विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे खानाची फौज तहानेने हैराण झाली. खानाला उंबरखिंडीत

Vasota Fort / किल्ले वासोटा

अवर्णनीय वनदुर्ग, वासोटा   वासोटा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार वंशीय दुसऱ्या राजा भोजकडे जाते . प्रथमत: शिर्के व मोरे यांच्याकडे वासोट्याचा ताबा गेला . पुढे ६ जून , १६६० रोजी शिवरायानी वासोटा किल्ला जिंकला . राजापूर प्रकरणी पकडलेल्या राव्हग्टन व इतर इंग्रजाना शिवरायांनी या किल्ल्यावरच कैदेत ठेवले होते . पुढे २७ सप्टेंबर , १६७९ रोजी शिवरायांना या गडावरच गुप्तधनाने भरलेले ४ हंडे सापडले . इ.स. १७०० मध्ये औरंगजेबने सज्जनगडास वेढा घातल्यानंतर परशुराम प्रतिनिधींनी सज्जनगडावरील सर्व मौल्यवान मूर्ती वासोट्यावर आणून ठेवल्या होत्या . पुढे १७३० मध्ये औंधचे प्रतिनिधी व पेशवे यांच्यात तंटा निर्माण झाला . पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी पंतप्रतिनिधीचा पराभव केला . पण आपल्या धन्याचा पराभव सहन न होऊन ताई तेलीणीने वासोटा किल्ल्यावर जाऊन पेशव्याविरुध्द बंड पुकारले . तब्बल ८ - १० महिने झुंज देऊन बापू गोखल्यांनी वासोटा परत जिंकून घेतला . त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गंमतीचा उल्लेख येतो- "श्रीमंत प्रतिनिधींचा हा अजिंक्य किल्ला वासोटा । ताई तेली

Visapur Fort , Malavali / किल्ले विसापूर , मलवली

विसापूर ऊर्फ संबळगड : मुंबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवलीरेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. इतिहास : मराठे इ.स. १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवडात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहचला. तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले म्हणून तो तेथे पोहचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहचले. १६८२ मध्ये मराठांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्चइ.स. १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवश