Skip to main content

पंत सचिवांचा वाडा ( शिरवळ ) / Pant Sachivancha Wada ( Shirwal )

पंत सचिवांचा वाडा
( शिरवळ , ता.खंडाळा ,जि.सातारा)
पुणे-सातारा महामार्गावर नीरा नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक असे शिरवळ हे गाव. स्वराज्याची पहिली लढाई म्हणून ओळख असणारे हे ऐतिहासिक गाव .याच गावात असणारा हा पंत सचिवांचा भव्य वाडा. पुण्यापासून अवघ्या 60 किमी अंतरावर आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सचिव पदावर शंकराजी नारायण होते , यांच्या पुढील पिढीत भोर संस्थान निर्माण झाले. या संस्थानातील शिरवळ विभागाची प्रशासकीय कचेरी शिरवळ येथे होती. त्यासाठी भोरकरांनी हा भव्य वाडा बांधला. सुमारे १३० वर्षापूर्वीचा हा वाडा आजही पंतसचिव घराण्याच्या इतिहासाची साक्ष देतो आहे. 

केदारेश्वर मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर पूर्वाभिमुखी उभ्या असलेल्या वाड्याच्या सागवानी महादरवाजा त्यावरील सुबक विटकाम आपलं लक्ष वेधून घेते. या वाड्यास एकूण दोन चौक आहेत. दरवाजातून आत आल्यावर पहिल्या चौकात समोरच भक्कम लोखंडी गजांची दारे असलेल्या खोल्या दिसतात, तसेच उजव्या हाताला लाकडी जिना त्यावर पत्र्याचे छप्पर आपणास बघावयास मिळते. जिना चढून गेल्यावर आपणास दोन सोपे दिसतात. पाहिल्या चौकाच्या बरोबर मध्य भागी असलेल्या लाकडी चौकटीतून आपण दुसऱ्या चौकात येऊन पोहचतो. चौकात आल्यावर उजव्या बाजूस पुन्हा तसाच भक्कम लाकडी जिना नजरेस पडतो. जिना चढून गेल्यावर आपणास दोन सोपे दिसतात. या चौकाच्या पश्चिमेच्या बाजूस दोन दिंडी दरवाजे आहेत. वाडा कौलारू असून अतिशय प्रमाणबद्ध आणि ताशीव लाकडांच्या मजबूत तख्तपोशिंनी युक्त आहेत.


सध्या हा वाडा रयत शिक्षण संस्थेकडे आहे. संस्थेचे आदर्श विद्यालय या वाड्यात भरत होते. पण सध्या वाड्याच्या शेजारी शाळेसाठी नवीन इमारतीचे बांधकाम झाल्यामुळे, आत्ता शाळा तिथे भरते. "रयत शिक्षण संस्थेने १ रुपये प्रति माह ह्या किमतीवर वाडा भाड्याने घेतली होती." - अशी माहिती आम्हाला आदर्श विद्यालयाच्या तत्कालीन मुख्याध्यापकांनी दिली होती.


सचिव घराणे :
भोरकर पंत सचिव घराण्याचा मूळ पुरुष शंकराजी नारायण. आपल्या कर्तुत्वाच्या बळावर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सचिव पदावर आले. तसेच राजाराम महाराजांच्या काळात देखील पराक्रमाची शर्थ केली. त्यांचा पराक्रम , स्वामिनिष्ठा देखोन राजाराममहाराज यांनी त्यास "राजाज्ञा" 'किताब दिला. २७ ऑक्टोबर १७०७ रोजी शंकराजी नारायण सचिव यांनी आपला देह नीरा नदीच्या काठावर अंबवडे गावी ठेवला. भोर संस्थानात एकूण ५०२ गावे होती ; शिरवळ ,नसरापूर ,कोळवण , वेल्हे, पाली या पाच महालांत विभागली होती. त्यापैकी भोर , शिरवळ ,व पाली येथे नगरपालिका होत्या. तेथे स्वतंत्र अधिकारीवर्ग असून त्यासाठी प्रशासकीय कार्यलयाची स्वतंत्र इमारत असे. तोच हा शिरवळमधील वाडा. भोर संस्थानचा वैभवशाली इतिहास घेऊन उभा आहे. 

टीप : वाडा आतून बघण्यासाठी आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची परवानगी घेणे अनिवार्य आहे.

संदर्भ :
- महाराष्ट्रतील ऐतिहासिक वाडे 
- भोर संस्थान 

माहिती आभार :
- महेश्वर चव्हाण 
- विकास चौधरी 

मार्गदर्शन आभार :
- पियुषा मरगजे

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...