Skip to main content

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे

सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली. 

पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली. 


सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ जवळ ३० वर्षे हे मंदिर बांधायला लागली. सन १७६१ मध्ये नारो अप्पाजी खिरे यांनी या मंदिराच्या पायाची उभारणी केली. पुढे हेच घराणे तुळशीबागवाले म्हणून ओळखले जाऊ लागले. सरदार खासगीवाले यांच्याकडे कारकून पदावर असणाऱ्या खिरे याना नानासाहेब पेशव्यानी सुभेदारी दिली होती. नारो अप्पाजी हे आपल्या कारभारात अत्यंत कुशल होते व आपल्या कारकिर्दीत त्यांच्यावर एकदाही गैरव्यवहाराचा ठपका बसला नाही. त्या काळी खासगीवाले यांची बाग ही पुण्याची सीमा होती. सध्या दिसत असणारी मंडई या भागात खासगीवाल्यांची मोठी बाग होती, तुळशीबागवाले यांनी खासगीवाले यांच्याकडून एक एकराची बाग विकत घेतली आणि तिथे अनेक देवालायांचा परिसर उभा केला.

दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बांधण्यात आलेला बुधवार वाडा हा सध्याच्या बुधवार चौकात होता, पुण्याते विश्रामबागवाडा, बुधवारवाडा आणि शुक्रवारवाडा असे तीन वाडे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पुण्यात बांधण्यात आले. पैकी बुधवार वाड्यात कचेरीचे काम प्रामुख्याने होते असे. हा वाडा सन १८७९ मध्ये लागलेल्या आगीत जाळून खाक झाला. 


बुधवार पेठे ही शनिवार पेठेला लागून असल्याने पेशव्यांच्या काळात येथे बरीच वस्ती झाली होती. तसेच मोठ्या मोठ्या सरदारांच्या असणाऱ्या बाग यामुळे या पेठेला बरेच महत्व होते. अनेक मंदिरे, भव्य बागा, पेशव्यांचा वाद, कोतवाल चावडी यांमुळे ही पेठ तेव्हाही प्रसिद्ध होतीच तसेच आजही तुळशीबाग, दगडूशेठ मंदिर, भाजी मंडई यासारख्या परिसरामुळे या पेठेचा परिसर हा अगदी गजबजून गेलेला असतो. 


फोटो - 
१. तुळशीबाग राम मंदिराचा कळस
२. तुळशीबाग राम मंदिराचा तत्कालीन फोटो - सिद्धार्थ जोशी
३. नव्या मंडईचे एक रेखाचित्र
४. हरवलेले पुणे या अविनाश सोवनी लिखित पुस्तकातील खासगीवाले बाग परिसराचा नकाशा

माहिती व छायाचित्र आभार :
शंतनू परांजपे

Comments

Popular posts from this blog

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...