Skip to main content

महादजी शिंदे / Mahadaji Shinde


अलिजाबहाद्दर महादजी शिंदे
महादजी शिंदे यांच्या कार्यकतृत्वास प्रारंभ होण्यापूर्वीच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढीत आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला.

त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना म्हणजे पानीपतचे युद्ध होय. या युद्धात ते स्वत: हजर होते त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचे बंधु तुकोजी व पुतणे जनकोजी शिंदे ठार झाले. पूर्ण शिंदेशाही पथकाचा नाश होऊन मराठ्यांचा पराभव झाला व या युद्धातुन त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेऊन ते परत फिरले. वाटेत त्यांच्यावर प्राणांकीत हल्ला झाला. त्यातून वाचून ते सुखरूप परत दक्षिणेत आले.

आधीच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्युचे दुःख, त्यात ते एकटेच कर्तृत्वान पुरूष उरले. त्यामुळे सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यात पेशवे कुटुंबातील संघर्षाचा फटका महादजीस बसला व त्यांच्या दौलती विषयी वाद सुरू झाला. त्यात त्यांची महत्वाची सात वर्ष गेली. तरिही त्यांनी न डगमगता धिराने या दरम्यान स्वत:चे बस्तान बसविले.

उज्जैन येथील जहागिरदारीची व्यवस्था लावून सैन्य उभारले पैसा वसुल केला व मल्हारराव होळकरांच्या साथीने उत्तरेतील मराठ्यांची स्थिती सुधारण्याचा प्राथमिक प्रयत्न करून स्वत: अस्तित्व दाखवून इतरांस दखल घेण्यास भाग पाडले. यामुळे त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत दाखबिलेली धैर्य मानसिकता यामुन त्यांचे कार्यकतृत्व शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे भारताच्या मध्ययुगीन इतिहासात चमकते .

महादजी शिंदे यांनी हिंदुस्थानात कार्य करित असतांना मराठेशाहीच्या हिताबरोबरच आपला स्वाभिमान व वैभव सांभाळले. स्पर्धेत टिकण्यासाठी धन, संपत्ती, हत्यारे, सैन्य, प्रभावळ व जहागिरी कायम अबाधित ठेवली, कारण साम्राज्य निर्मितीसाठी या सर्व गोष्टीची आवश्यकता होती.

महादजी शिंदे यांनी शहाजीराजे, छ. शिवाजी महाराज व शाहू यांच्या प्रमाणे अखील हिंदुस्थानातील मराठ्यांचे महत्व जाणले व मराठ्यांच्या सहकार्याशिवाय दिल्‍लीची मोगलशाही सत्ता टिकू शकत नाही, हे महादजी शिंदे यांनी ओळखले. त्याच प्रमाणे महादजींना स्वत:च्या कार्यकर्तृत्वाची जाण होती आणि त्याच्या बळावरच त्यांनी पेशवे, इंग्रज, फ्रेंच, मोगल, राजपूत, जाट व शिख दरबारात वर्चस्व प्रस्तापित करून पूर्ण हिंदुस्थानात पुनः मराठ्यांचा दरारा निर्माण करून मराठ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला.

- मराठ्यांच्या इतिहासातील महादजी शिंदे यांचे योगदान

साभार : मराठा रियासत

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka )

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka ) A huge monolithic Shiva Linga inside a cella, built by the side of the Lakshmi-Narasimha Temple enclosure. The Shiva Linga has a three-eye mark drawn on it in line carving. The three-eye mark depicts the three eyes of Lord Shiva. It is believed that the temple has been in existence since the period of the Vijayanagara Empire. This huge Linga, which is about 5 meters high, is locally called by the name Badaviling or Badavilinga. It is noteworthy that a channel that runs by the side of this shrine is diverted to enter the cella and thus this Linga is made to stand amidst water always. This Linga is situated inside a small stone chamber. There is a single opening in front of the chamber through which devotees can get in. An interesting thing to note about the design of the stone chamber is that it has no ceiling. During the daytime, sunlight enters through the opening in the ceiling and floods the Shiva Linga wi...