Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

वीर कोयाजी बांदल यांची समाधी, भोर / Samadhi Of Veer Koyaji Bandal

वीर कोयाजी बांदल समाधिस्थळ  नेकलेस पॉईंट पासुन हाकेच्या अंतरांवर मुख्य वाटेपासुन आडबाजूला झाडीत स्वराज्य स्थापनेच्या उभारणीसाठी झटलेल्या अगणित वीर योद्धांपैकी एक योद्धा विसावलाय. स्वराज्यातील मानाच्या तलवारीच्या पहिल्या पात्याचा मान मिळवलेलं बांदल घराणं. शाहिस्तेखानाच संकट स्वराज्यावर येऊन धडकले होते.याच शाहिस्तेखानाला मातित गाडण्यासाठी बारा मावळची ४०० रनमर्दानची फौज तयार केली.याच फौजेत "हिरडस मावळचे कोयाजीराजे नाईक-बांदल" हे ही होते. या लढाई मध्ये शाहिस्तेखानाची पळता भुई करुन सोडल होत. या लढाईत पराक्रमांची शर्त लढवत असताना कोयाजीराजे नाईक-बांदल धारातिर्थ पडले. नेकलेस पॉइंट पासुन थोड्याच अंतरांवर या योद्ध्याचे समाधिस्थळ आहे. पण ना तिथे कोणती पाटी आहे ना कोणती माहिती त्यामुळे तिकडे फारसं कोणी फिरकत ही नाही. आपल्यासारख्या भटक्यांची पावलं कधी पडतील याच प्रतिक्षेत हे स्थळ आजही वाट पहात आहे. जेव्हा केव्हा तुम्ही इथून जाल तेव्हा नतमस्तक व्हायला विसरु नका अन जमलंच तर एखादं रानफुल ही अर्पण करायला विसरु नका. 🍁

श्री विठ्ठल मूर्ती, दिवे घाट / Shree Vitthal Statue , Dive Ghat

दिवे घाटातील विठ्ठलाची साठ फुटी भव्य मूर्ती वारकरी आणि पुणेकरांसाठी भक्तिमय आकर्षण आहे. विजय कोल्हापुरे आणि बाबासाहेब कोल्हापुरे या वारकरी बंधूंच्या राजराजेश्र्वर सेवाभावी संस्थेतर्फे ही मूर्ती उभारण्यात आली. मूर्तिकार सागर भावसार यांनी ही मूर्ती साकारली असून यामध्ये सिमेंटसह काही धातुंचाही वापर करण्यात आला आहे. मूर्तीचे मुख्य आकर्षण असलेल्या टीळयाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. ही भव्य मुर्ती बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. घाटाच्या माथ्यावर असल्यामुळे अनेक प्रवाशांचा प्रवास सुखद करणारी ही मूर्ती हक्काच्या वारकऱ्यांची आतुरतेने वाट पाहत असते. “दिवेघाट चढून आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा आणि भक्तांचा थकवा दूर व्हावा एवढीच माझी इच्छा होती. विठूरायाकडे मी दुसरं काहीच मागत नाही. ही मुर्ती घडवण्याचं काम गेली दोन वर्ष सुरु होतं,” असं विजय कोल्हापूरकर यांनी सांगितलं आहे.

छठ पूजा का इतिहास / History of Chhath Puja

छठ पूजा का प्रारंभ कब से हुआ सूर्य की आराधना कब से प्रारंभ हुई इसके बारे में पौराणिक कथाओं में बताया गया है।   छठ पूजा में सूर्य देव और छठी मैया की पूजा विधि विधान से की जाती है। छठ पूजा का प्रारंभ कब से हुआ, सूर्य की आराधना कब से प्रारंभ हुई, इसके बारे में पौराणिक कथाओं में बताया गया है। सतयुग में भगवान श्रीराम, द्वापर में दानवीर कर्ण और पांच पांडवों की पत्नी द्रौपदी ने सूर्य की उपासना की थी। छठी मैया की पूजा से जुड़ी एक क​था राजा प्रियवंद की है, जिन्होंने सबसे पहले छठी मैया की पूजा की थी। आइए जानते हैं कि सूर्य उपासना और छठ पूजा का इतिहास और कथाएं क्या हैं।   1. राजा प्रियवंद ने पुत्र के प्राण रक्षा के लिए की थी छठ पूजा एक पौराणिक कथा के अनुसार, राजा प्रियवंद नि:संतान थे, उनको इसकी पीड़ा थी। उन्होंने महर्षि कश्यप से इसके बारे में बात की। तब महर्षि कश्यप ने संतान प्राप्ति के लिए पुत्रेष्टि यज्ञ कराया। उस दौरान यज्ञ में आहुति के लिए बनाई गई खीर राजा प्रियवंद की पत्नी मालिनी को खाने के लिए दी गई। यज्ञ के खीर के सेवन से रानी मालिनी ने एक पुत्र को जन्म दिया, लेकिन वह मृत पैदा

वसुबारस ( गोत्सव व गोधना )

वसुबारस (  गोत्सव व गोधना   ) दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा, असे म्हटले जाते. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणार्‍या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्‍या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्‍या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्‍या, शेतीला उपयुक्‍त अशा बैलांना जन्म देणार्‍या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया

दिवाळीत लहान मुलं एकत्र जमून किल्ला का बनवतात ?

दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, शाळेला सुट्टी, नवीन कपडे आणि किल्ला या सार्‍या गोष्टी आठवतात ना तुम्हाला. पण तुम्हाला माहितेय का ? दिवाळीत लहान मुलं एकत्र जमून किल्ला का बनवतात ? कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. लहानपणी किल्ला करताना हे सारे प्रश्न पडायचे. पण उत्तर मात्र मोठे होताना सापडलं. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे. आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड या सार्‍यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपला भारत, आपला महाराष्ट्र गुलामगिरीत जगत होता , सुराज्य हे फक्त स्वप्न बनून राहिले होते तिथे कसले आले सण आणि कसला उत्साह. हा उत्साह , विश्वास देण्याच काम केल स्वराज्याने. शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या स्वराज्यात स्वातंत्र्य होत. लोकांना सुरक्षितता होती आणि शोषण थांबल होत. लोक खरोखर सुराज्य , रयतेच राज्य स्वप्नाच्या जगातून प्रत्यक्षात उतरलेलं बघत होते. त्यानंतरच दिवाळीला खरा अर्थ प्राप्त झाला . स्वाभिमान जागृत झालेली मानस आता गुलामीतून बाहेर

मस्तानी तलाव , पुणे / Mastani Lake , Pune

मस्तानी तलाव , पुणे  पुणे शहराच्या आजूबाजूला अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी कायम खुणावत असतात. पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला वडकी गावाजवळ असाच एक ठिकाण आहे, ज्याला ' मस्तानी तलाव ' या नावानं ओळखलं जातं. या तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची पत्‍नी मस्तानी हिचे नाव देण्यात आले आहे.  दिवे घाटाच्या पायथ्याशी बांधलेला हा तलाव आजही आपल्या इतिहासाच्या खुणा जपून आहे. सध्या रस्ता झाल्याने जाणे देखील सुकर झाले आहे, त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही उत्तम पर्याय आहे. तसे पहायला गेले तर हे पेशवे काळातील एखादे छोटे धरण असावे कारण याची नीट रचना आपण पाहिली तर याला एक बंधारा आपल्याला पहायला मिळतो. दिवे घाटाच्या डोंगरातून पावसाचे पाणी येऊन हे सगळे पाणी या बंधाऱ्यामध्ये साठवले जाते. या बंधाऱ्याला सुंदर कामान देखील आहे. साधारणपणे जवळपास ६ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास १५ फुट आहे . तलावाच्या इथे आपल्याला एक भूयाराचे तोंड देखी