Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

धोम धरण, धोम ( सातारा ) / Dhom Dam, Dhom ( Satara )

धोम धरण, धोम (सातारा  ) महाबळेश्वर येथूनच कोयनेच्या बरोबरीने उगम पावलेली कृष्णा नदी पूर्वेकडे दरीत झेपावते आणि वाईच्या दिशेने मार्गक्रमण करते. या वाईजवळ धौम्य ऋषींच्या आश्रमामुळे प्रसिद्ध पावलेल्या धोम गावाजवळ धोम धरण बांधलेले आहे. सन १९७८ मध्ये हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे कृष्णेवरील पहिले धरण होय. या धरणाची पाणी साठवण क्षमता १४ टीएमसी असून या धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. वाई , सातारा , जावळी , कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यांना या सिंचनाचा लाभ होतो. यावर ४ मेगावॅट क्षमतेचा जल उर्जा प्रकल्प आहे. हे धरण सातारा शहरापासून ४४ कि.मी. (वाई पासून ९ कि.मी.) अंतरावर आहे. बोट क्लबची सुविधा येथे उपलब्ध असून पांचगणी येथील टेबल लँड वरून सुद्धा बोट क्लब व बोटिंगची  दृश्ये पहावयास मिळतात. मत्स्य संवर्धनाची कामे या ठिकाणी चालतात. धोम येथील श्री नरसिंहांचे मंदिर व सिद्धेश्वर मंदिर पाहण्याजोगे आहे. Instagram ID : @travelwala.chora

ढोल्या गणपती ( महागणपती ), वाई / Dholya Ganpati ( Mahaganpati ), Waai

ढोल्या गणपती ( महागणपती ), वाई   सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणरे ‘ढोल्या गणपती’चे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. दररोज हजारो भक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी तर हा आध्यात्मिक ठेवा आहे. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ‘ढोल्या गणपती’ असे परिचित नाव आहे. हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरस्र असून, वारंवार येणाऱ्या नदीच्या पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडील मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले जाऊन पाण्याचा दाब कमी होते व मंदिर सुरक्षित राहते. गर्भगृहात अर्धा मीटर उंच चौथऱ्यावर गजाननाची रेखीव बैठी एक मीटर ८० सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. तिची स्थापना वैशाख शु. १३ शके १६९१ ला करण्यात आली. मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्याने कदाचित त्याला ‘ढोल्या गणपती’ असे

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर / Gondeshwar Temple, Sinnar

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर बाणासूर राक्षसाने सिन्नर नगरी उचलून पालथी केली, अशी अख्यायिका सिन्नरबाबत सांगितली जाते. सिंधीनगर उर्फ सेनुनापूर अन् ‌नंतर सिन्नर अशी अनेक नावं एखाद्या नक्षीदार शालीसारखे पांघरत या नगरीने मोठा प्रवास केला आहे. सेऊणचंद्राने 'सेऊणपुरा' या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वस्ती निर्माण केली असे काही ताम्रपटात म्हटल्याचे दिसते. सिन्नरचा इतिहास जेवढा अनोखा आहे. तेवढीच तेथील मंदिरेही देखणी आहेत. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. हे एकटे मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे. म्हणूनच गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे. हे मंदिर पुरातन, भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीच

महादजी शिंदे / Mahadaji Shinde

अलिजाबहाद्दर महादजी शिंदे महादजी शिंदे यांच्या कार्यकतृत्वास प्रारंभ होण्यापूर्वीच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीचा विचार करता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढीत आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला. त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना म्हणजे पानीपतचे युद्ध होय. या युद्धात ते स्वत: हजर होते त्यांच्या डोळ्यादेखत त्यांचे बंधु तुकोजी व पुतणे जनकोजी शिंदे ठार झाले. पूर्ण शिंदेशाही पथकाचा नाश होऊन मराठ्यांचा पराभव झाला व या युद्धातुन त्यांनी अखेरच्या क्षणी माघार घेऊन ते परत फिरले. वाटेत त्यांच्यावर प्राणांकीत हल्ला झाला. त्यातून वाचून ते सुखरूप परत दक्षिणेत आले. आधीच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्युचे दुःख, त्यात ते एकटेच कर्तृत्वान पुरूष उरले. त्यामुळे सर्वांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यात पेशवे कुटुंबातील संघर्षाचा फटका महादजीस बसला व त्यांच्या दौलती विषयी वाद सुरू झाला. त्यात त्यांची महत्वाची सात वर्ष गेली. तरिही त्यांनी न डगमगता धिराने या दरम्यान स्वत:चे बस्तान बसविले. उज्जैन येथील जहागिरदारीची व्यवस्था लावून सैन्य उभारले पैसा वसुल केला व मल्हारराव होळकरांच्या

प्राचीन पुणे / Ancient Pune

प्राचीन पुणे   आपण राहतो ते गाव किती जुने आहे हे प्रत्येक गावकऱ्याने माहिती करून घेतलेच पाहिजे , कारण त्या गावाचा वारसा आपण पिढ्यान्पिढ्या जपतो. जसे एखाद्या देवळात गेल्यावर क्षेत्रमाहात्म्य सांगितले जाते आणि ते आपण भक्तिभावाने ऐकतो , तसेच आपले गाव हे आपल्याच नव्हे , तर आपल्या पूर्वजांचेही कार्यक्षेत्रच. त्या क्षेत्राचा महिमा , त्याचे महत्त्व आणि माहात्म्य आपणालाच माहिती नसेल तर येणाऱ्या पिढ्यांना काय समजणार. म्हणूनच ज्या पुण्यात आपण राहतो , त्या पुण्याची , पुण्याच्या इतिहासाची थोडी माहिती करून घेणे आवश्यक आहे . त्रिखंडात गाजलेले पुणे , जरी पेशव्यांच्या काळापासून भरभराटीला आले असले , तरी पुण्याला प्राचीन इतिहासाचे अधिष्ठान आहे . या इतिहासाची पूर्वपीठिका अगदी प्राचीन काळापासून म्हणजे अश्मयुगापासून आहे. काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेजच्या परिसरात नदीच्या पात्रात अश्मयुगीन दगडी हत्यारे सापडली , तेव्हा पुण्यात आदिमानवांची वस्ती असावी असा तर्क गृहीत धरून शोध घेण्यास सुरुवात झाली . पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कोरेगावातही अश्मयुगीन हत्यारे व साधने सापडली. काळ्या न

वाड्यांचा इतिहास / History Of Wadas

   वाड्यांचा इतिहास " वाडा " हा महाराष्ट्रात विकसित झालेला परंपरागत निवासस्थानाचा प्रकार आहे. हा वास्तुप्रकार पेशवेकाळात उदयास आला. मराठा साम्राज्यात साधारणपणे सतराव्या शतकाच्या शेवटी ते १८१८ पर्यंत (पेशवे ब्रिटिशांच्या अधीन होईपर्यंत) वाडासंस्कृती पुण्यात भरभराटीस आली. पुढे १९ व्या शतकातही वाडे बांधले गेले, परंतु पेशवेकाळातच वाड्यांची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. पेशवा बाजीराव ( पहिला ) यांनी पुण्यास राजधानी हलविली. बाजीरावानी १७३०-३२ च्या सुमारास ‘शनिवार– वाडा‘ हा राजेशाही वाडा बांधला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या मध्यावर पुण्यात अनेक मंदिरे, घाट आणि वाडे बांधले गेले. बाजीराव ( पहिला ) यांनी पुण्याला राजधानी बनविले, त्याआधी पुण्यात सहा पेठा अस्तित्वात होत्या. पेठ बांधणे हा सरकारी आणि खाजगी असा संयुक्त उपक्रम असे. त्याकाळी राज्यकर्ते आपल्यातल्या विश्वासू माणसांस पेठ बांधण्याचा हक्क, परवानगी आणि जबाबदारी द्यायचे. पेठा बांधण्याचे काम सरकारी नियोजन आणि तात्कालिक निर्णय यातून पूर्णरुपास यायचे. पेशवाईच्या काळात पेठा बांधण्याच्या कामाला औपचारिक स्वरूप आले. या काळात पेठा बा