Skip to main content

नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ), मेणवली ( वाई ) / Nana Fadnavis Wada ( Menavali Wada ), Menavali ( Wai )

नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा )
वाई पासून जवळ ३.५ किमी अंतरावर मेणवली गाव वसले आहे. इथेच नाना फडणवीस वाडा ( मेणवली वाडा ) हा राजमान्य राजश्री नाना फडणवीसांनी १७७० च्या दशकात बांधला. याबरोबर त्यांनी वाड्याच्या पाठी कृष्णा काठी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधल. इथेच महादेवाचे आणि विष्णूचे (मेणवलेश्वर) मंदिर बांधले. मेणवलेश्वर आणि वाड्याच्या भिंती भित्तिचित्रांनी अलंकृत केले. मेणवली हे गाव भगवंतराव त्र्यंबक पंतप्रतिनिधी आणि रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना इनाम मिळाले होते.

हा वाडा जवळपास ३४६०२ चौरस फूट इतक्या जागेवर पसरलेला आहे. दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून तीन दिशांना बुरुज आहेत. वाड्याच्या उत्तर पश्चिम आणि दक्षिण अशा तीन दिशांना प्रवेशद्वारे आहेत. वाड्याच्या पूर्व बाजूने मुख्य प्रवेश आहे आणि त्याचा दरवाजा उत्तराभिमुख आहे. इथेच नगारखाना आहे. वाड्याच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वार वाड्याच्या मागच्या बाजूला नदीघाटावर उघडते. वाड्यात एकूण ६ चौक आणि जवळपास २०० लहानमोठे खन आहेत. बांधकाम करताना काळ्या पाषाणातले भक्कम जोते उभारून त्यावर लाकडी खांब आणि तुळ्याची चौकट उभारली आहे. तसेच पुडाच्या भिंती बांधून त्यावर चुन्याचे काम केले आहे. भित्तिचित्रे, तक्तपोशी, सुरूचे खांब आणि नक्षीदार कमान यांच्या रूपात इथे मराठाकालीन कलेचे काही उत्कृष्ट नमुने पाहायला मिळतात.


वाड्याच्या प्रवेश द्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरात बान्धलेली विहीर आहे. या विहिरीचे पाणी खापरी नळाद्वारे सायफन पद्धतीने वाड्यात नेले होते असे म्हणतात. या वाड्यात नाना फडणवीसांचे केव्हा आणि किती दिवस वात्सव्य होते याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि वाड्याचे बांधकाम झाल्यांनतर काही महीने इ.स. १७९१ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांबरोबर वाईस आले असता त्यांचा मुक्काम मेणवली मध्ये होता. सन १८०० मध्ये नानांचा देहांत झाला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी जिऊबाई यांनी या वाड्यात वास्तव्य केले. आज हा वाडा त्यांच्या वंशजांची म्हणजेच फडणीस-मेणवलीकर कुटुंबीयांची खाजगी मालमत्ता आहे.

‘धकाधकीच्या राजकारणातून एकांतवास मिळावा म्हणून हा वाडा बांधला, परंतू फार अल्पमुदतीच्या भेटी त्यांनी मेणवलीला दिल्या.' - असे सातारा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सांगितले. ( माहिती आभार : अभिषेक यादव 🙏 )

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...