Skip to main content

१ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव ( जयस्तंभ )


सदर पुस्तकाच्या नावातूनच पुस्तकाचा आशय कळून येतो. पण लेखकांच्या 'वास्तव' शब्दाचा अर्थ आत्ता 'विस्तव' म्हणून घेतल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण काही समाजकंटकांकडून सारखा हा विस्तव भडकवला जात आहे. 

इतिहास अशी गोष्ट आहे, जिथे 'ध चा मा' झाला तरी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य संपते. म्हणून तत्कालीन कागदपत्रे, शिलालेख, झालेला पत्रव्यवहार यांवरच इतिहास अभ्यासला जातो. पण वाईट गोष्ट अशी की, असा इतिहास अभ्यासणाऱ्याला सध्या फक्त ट्रोल केले जाते. आपले अज्ञान आणि असत्याचा प्रोपोगंडा हीच याची कारणे देता येतील. 

कोरेगाव भीमा, भीमा नदीच्या काठावर असलेले एक खेडे म्हणून या गावाला 'कोरेगाव भीमा' नाव मिळाले. पुढे याच गावच्या हद्दीत एक चकमक झाली, त्याला लढाई संबोधले गेले. ही लढाई होती मराठा विरुद्ध इंग्रज... इंग्रजांनी संपूर्ण भारत ताब्यात घेतल्यानंतरही फक्त मराठे त्यांना विरोध करत होते, हे सर्वश्रुत आहे. पण मराठ्यांमधील अंतर्गत वादात इंग्रजांनी मध्यस्ती करण्याच्या बहाण्याने हळू हळू मराठी सत्ता खिळखिळी करून टाकली. अशीच एक कोरेगावची लढाई. 

३१ डिसेंबर १८१७ रोजी मराठा गादीचे वंशज छत्रपती प्रतापसिंह, दुसरे बाजीराव पेशवे व त्यांचे जवळपास २८००० सैन्य इंग्रजांनी बळकावलेले पुणे जिंकण्यासाठी निघाले असता, फुलगाव येथे मुक्कामी होते. तर पुण्याच्या रक्षणासाठी कर्नल बर्र याने शिरूर येथे असलेल्या कॅप्टन स्टाँटन या अधिकाऱ्याला ससैन्य बोलवून घ्यायला पत्र पाठवले होते. कॅप्टन स्टाँटनच्या सैन्यात ७७५ सैनिकांचा समावेश होता. त्यामध्ये सुन्नी, मुस्लिम, पठाण, बलोचि, ब्राम्हण, रजपूत, मराठा या सर्व जातीधर्मातील लोक होते. कोरेगाव भीमाजवळ मराठा आणि हे सैन्य एकमेकांच्या समोर आले असता कॅप्टन स्टाँटनला मराठा सैन्यासोबत लढण्यावाचून पर्याय उरला नाही, तर मराठा सैन्यालाही या सैन्याला मारल्याशिवाय पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणे अवघड होऊन बसले. 

१ जानेवारी १८१८ ला या दोन्ही सैन्यात चकमक झाली यात, दोन्हीकडून ७००-८०० सैनिक खर्ची पडले. मराठ्यांनी प्रतापसिंह छत्रपती सोबत असल्यामुळे त्यांच्या जिवाच्या काळजीने इंग्रजांना जास्तीची कुमक येण्याआधी साताऱ्याच्या दिशेने, तर कुमक न मिळाल्याने आणि बरेच नुकसान झाल्यामुळे कॅप्टन स्टाँटनने शिरूर च्या दिशेने आपले सैन्य हलवले. अशा प्रकारे ही लढाई अनिर्णायक ठरली. या पराक्रमाची याद म्हणून इंग्रजांनी मौजे पेरणे या गावात एक जयस्तंभ उभारला. ज्यावर इंग्रजांच्या बाजूने लढाईत लढलेल्या जखमी आणि मृत सर्व जातीच्या सैनिकांचा उल्लेख करण्यात आला. स्तंभाच्या संरक्षणासाठी याच लढाईत शौर्य गाजवलेल्या 'खंडोजी माळवदकर' यांना जमादार(इन-चार्ज) पदवी देऊन नेमणूक केली गेली. 

पण काही वर्षांनी अचानकपणे जातीयवाद करण्यासाठी इतर कारणे देऊन, इंग्रजांनी अस्पृशांना सैन्यात भरती नाकारली. १९१७ मध्ये पहिली महार बटालियन उभारली, पण पहिले महायुद्ध झाल्यावर ती विसर्जित करण्यात आली. याआधी महार बटालियन नव्हती. १९४१मध्ये पुन्हा डॉ. बाबाहेबांच्या प्रयत्नांनी 'महार बटालियनची' स्थापना झाली. 

ब्रिटिश सैन्याकडून लढलेल्या ३ लष्करी तुकड्यांतील सैनिकांची नावे आजही स्तंभावर आहेत. पुस्तकातही त्या तुकड्यांचा आणि नावांचा उल्लेख आहे. एवढंच काय तर संपूर्ण लढाईचा तपशील तत्कालीन पत्रव्यवहार, कागदपत्रे अशा संदर्भासह लेखकाने दिला आहे. शेवटी जाता जाता 'सिदनाक महार' यांच्याबद्दल केला गेलेला अपप्रचार आणि वास्तव देखील लेखकांनी मांडले आहे. 

घटनेच्या मुळाशी गेले असता, पुराव्यांअंती असे लक्षात येते, आजही जाणीवपूर्वक बहुजन समाजाला दुसऱ्या समाजाविषयी भडकवण्यासाठी खोट्या इतिहासाचा प्रचार केला जात आहे. यातून सुशिक्षित बहुजन समाजाने तथ्य नसलेल्या खोट्या भाकडकथांवर विश्वास न ठेवता, बाकी समाजाला खरा इतिहास सांगून सामाजिक द्वेष कमी करण्यास व राष्ट्रउभारणीसाठी हातभार लावणे गरजेचे आहे. 

सत्य इतिहासाचे उपासक असलेल्यांनी आणि सुशिक्षित लोकांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक..! 

पुस्तक - १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव
लेखक - अ‍ॅड. रोहन बाळासाहेब जमादार (माळवदकर) 

संकलन : आदित्य गरुड 

Comments

Popular posts from this blog

Pune Ganesh Utsav 2025

Pune Ganesh Utsav 2025 (Area/Location/Mandal Wise Decoration List) 1st Sarvajanik Ganapati Of India 1. Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Manache 5 Ganapati 1. Shree Kasba Ganapati 2. Shree Tambadi Jogeshwari Ganapati 3. Shree Guruji Taalim Ganapati 4. Shree Tulshibaug Ganapati 5. Shree Kesari Wada Ganapati Narayan Peth 1. Konark Sun Temple (Odisha) – Garud Ganapati, Narayan Peth 2. Bhoot Bangala – Bharat Mitra Mandal (Near Modi Ganapati), Narayan Peth 3. Shree Kedarnath Mandir – Bholenath Mitra Mandal, Narayan Peth Budhwar Peth / Tulshibaug 1. The Padmanabhaswamy Temple (Kerala) – Shrimant Dagdusheth Halwai Ganapati, Budhwar Peth 2. Mysuru Palace (Karnataka) – Babu Genu Ganapati Mandal, Budhwar Peth 3. Vishwa Vinayaka Dhaam – Honaji Tarun Mandal, Rameshwar Chowk, Budhwar Peth 4. Bhavya Vishnu Theme – Gajanan Mitra Mandal Trust, Tulshibaug, Pune 4. Vrindavan Nagari Theme – Shree Tulshibaug Ganapati, Tulshibaug, Pune Mandai / Shukrawar Peth 1. Krishna Kunj – Akhil M...

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...