Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

सातारा इतिहास / History Of Satara

सातारा ऎतिहासिक संदर्भ : सातारा मराठा साम्राज्याची राज्‍याची राजधानी होती. त्‍याचा विस्‍तार सुमारे १४ लक्ष कि.मी. इतका होता. या भुमीला सांस्‍कृतीक वारसा लाभलेला आहे. जिल्‍हयातील कित्‍येक थोर योध्‍दे, राजे, संत आणि थोर व्‍यक्तिमत्‍वांनी महाराष्‍ट्राचा इतिहास घडवला आहे. ई.स. पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे. दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते. हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘चालुक्य‘ , ’राष्ट्रकुट‘, ’शिलाहार‘, देवगिरीचे यादव , ’बहामनी‘ व ‘आदिल शहा‘, (मुस्लिम राज्यकर्ते), ’शिवाजी महाराज‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू-२ प्रतापसिंह‘ यांनी राज्य केले. मुस्लिम राज्‍यकर्त्‍यांनी ई.स. १२९६ मध्‍ये प्रथम जिल्‍हयावर आक्रमण केले. सन १७०७ पर्यंत मुस्लिमांचे अधिपत्‍य होते. सन १६३६ साली निजामशाहीचा

Gateway Of India, Mumbai / गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

Gateway Of India Some Interesting Facts : 1. The Gateway Of India is  India’s most unique landmark, situated in Mumbai, and is located at Apollo Bunder in South Mumbai, on the shore of the Arabian Sea. 2. This architectural marvel scores over any other monument in Mumbai. The foundation stone of the structure was laid on March 31st, 1913, but it took more than 13 years to get completed. 3. A Scottish architect built this symbol by the name of George Wittet to commemorate the visit of King George V and Queen Mary. 4. During British rule, it was used as the entry gate for visitors who can from the west. 5. This is the monument from where the last British troop left India for England in 1947. 6. The monument faces Mumbai Harbor and the Arabian Sea. 7. The arch of the gateway has a height of  26 meters, i.e., 85 feet, and its central dome of 15 meters, i.e., 49 feet in diameter. 8. The monument was built with yellow basalt and reinforced with concrete. The s

श्री सत्यनारायण तुलसी मानस मन्दिर, बनारस ( वाराणसी ) - उत्तरप्रदेश / Shri Satyanarayn Tulsi Manas Mandir, Banaras ( Varanasi ) - Uttar Pradesh

श्री सत्यनारायण तुलसी मानस मन्दिर, बनारस यह मन्दिर बनारस ( काशी ) के आधुनिक मंदिरों में से एक बहुत ही मनोरम मन्दिर है। यह मन्दिर बनारस के प्रसिद्ध दुर्गा मन्दिर ( दुर्गा कुंड पथ ) के समीप में है। इस मन्दिर को सेठ रतन लाल सुरेका ने बनवाया था। पूरी तरह संगमरमर से बने इस मंदिर का उद्घाटन भारत के पूर्व राष्ट्रपति महामहिम सर्वपल्ली राधाकृष्णन द्वारा सन् १९६४ में किया गया। इस मन्दिर के मध्य मे श्री राम, माता जानकी, लक्ष्मणजी एवं हनुमानजी विराजमान है। इनके एक ओर माता अन्नपूर्णा एवं शिवजी तथा दूसरी तरफ सत्यनारायणजी का मन्दिर है। तुलसी मानस मंदिर की सभी दीवारों पर रामचरितमानस के दोहे और चौपाइयां लिखी हैं। दीवारों पर रामायण के प्रसिद्ध चित्रण को बहुत सुन्दर ढंग से नक्कासी किया गया है । इसके दूसरी मंजिल पर संत तुलसी दास जी विराजमान है, साथ ही इसी मंजिल पर स्वचालित श्री राम एवं कृष्ण लीला होती है। इस मंदिर के बारे में कहा जाता है कि इसी स्थान पर तुलसीदास जी ने रामचरितमानस की रचना की थी, इसलिए इस तुलसी मानस मंदिर कहा जाता है। #banaras #varanasi #trave

पुण्यातील समाधी स्थळांची / स्मारकांची यादी ( Samadhi Places / Memorials In Pune )

पुण्यातील समाधी स्थळांची / स्मारकांची यादी :   १) नारायणराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे शहर  २) सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे शहर ३) चिमाजी अप्पा पेशवे - श्री ओंकारेश्वर मंदिर, पुणे शहर  ४) नानासाहेब पेशवे - सदाशिव पेठ, पुणे शहर ५) नाना फडणवीस - नानाचा वाडा, पुणे शहर ६) जंगली महाराज - शिवाजीनगर, पुणे शहर ७) महादजी शिंदे - वानवडी, पुणे शहर ८) लाडोजीराव नरसिंहराव शितोळे ( महादजी शिंदे यांचा जावई ) - संगम घाट, पुणे शहर  ९) संत ज्ञानेश्वर - आळंदी, पुणे शहर १०) संत तुकाराम - देहू, पुणे शहर  ११) थोरले माधवराव पेशवे - थेऊर, पुणे शहर १२) तानाजी मालुसरे - किल्ले सिंहगड, पुणे शहर १३) छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड, पुणे शहर १४) कान्होजी जेधे - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे १५) जिवा महाला - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे १६) शंकराजी नारायण सचिव - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे १७) कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे, ता. भोर, जि. पुणे १८) दिपाऊराजे बांदल - पिसावरे, ता. भोर, जि. पुणे १९) कोयाजी बांदल - नेकलेस प्वाइंट, ता. भोर, जि. पुणे २०) बाळाजी विश्वनाथ पेशवे - सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे २१

शहाजीराजे भोसले, होदेगिरी ( जि. दावणगिरी - कर्नाटक )

शहाजीराजे भोसले यांची समाधी राजस्थानच्या चित्तोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला (अहमदनगर जवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी) नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. शहाजीराजांनी आपले पुत्र

मालोजीराजे भोसले समाधी, इंदापूर ( जि. पुणे - महाराष्ट्र )

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची औरंगाबादच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर समाधी आहे. बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने औरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मा

श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ - पुणे / Trishund Ganpati Mandir, Somwar Peth - Pune

श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ - पुणे पुणे शहरात अनेक प्राचिन मंदिरे आहेत, परंतु अप्रसिद्ध असलेल्या त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली पुण्यातील या मंदिरापेक्षा वेगळी आहे. वेरुळच्या कोरीव लेण्यासदृश्य असणारे हे मंदिर उपेक्षित राहण्यामागे १८ व्या शतकात पुण्यातील तत्कालीन सामाजिक परिस्थिती कारणीभूत असावी. पुण्याच्या पूर्वभागात नाग झरीच्या काठावर असणार्‍या सोमवार पेठेत व मंगळवार पेठेच्या काही भागात त्या काळात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ. स. १६०० मध्ये शहापुरा ही पेठ वसवली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला उत्तेजन देऊन या पेठेचा विकास करून या पेठेचे सोमवार पेठ हे नामकरण केले. या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती असणाऱ्या भागास गोसावीपुरा म्हणत. हा समाज सधन होता. सावकारी, सुवर्ण व रत्ने यांचा व्यापार त्यांच्या हातात होता. येथील स्मशानात अनेक गोसावी सत्पुरुषाच्या समाध्या होत्या. या समाध्यांशेजारी शिवमंदिरे उभारण्याची पद्धत त्या काळात होती. कित्येक समाध्यांचे अवशेष अद्यापही दृष्टीस पडतात, स्मशानामुळे येथील मंदिरांमध्ये भाविकांची वर्दळ नव्हती. त्रि