Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, पुणे / Shrimant Bhausaheb Rangari Ganpati, Pune

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बुधवार - पुणे भाऊसाहेब उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवातील एक महत्त्वाचे नाव. ते पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. भाऊसाहेब रंगारी राजवैद्य होते. त्यांचा वाडा बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरी मंदिर व शनिवारवाडा या दोन वास्तूंमध्ये आहे. त्यांचा दवाखाना देखील याच वाड्यात होता. त्यांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता. त्यावरून "रंगारी" हे उपनाव पडलं होतं. शालूंवरून तेथील बोळास "शालूकर बोळ" म्हणून नाव होते. क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब रंगारी यांचा सक्रीय सहभाग होता. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊ रंगारींचे मार्गदर्शन अनेक क्रांतीकारकांना लाभले. कृष्णाजी काशिनाथ खासगीवाले उर्फ नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले असता तिथे त्यांनी सार्वजनिक स्वरूपात थाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर त्यांना पुण्यात असा उत्सव सुरू व्हावा असे वाटू लागले. त्यानंतर भाऊ रंगारी, खासगीवाले व घोटवडेकर यांनी प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. १८९२ मध्ये स्थापलेला हा ह

कै. श्रीमंत दगडूशेठ हलवाई / Late. Shrimant Dagluseth Halwai

कै. श्रीमंत दगडूशेठ हलवाई १९ व्या शतकातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी म्हणून ओळखले जाणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ ह

मानाचे गणपती, पुणे / Manache Ganpati, Pune

मानाचे गणपती, पुणे संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात आणि भारता बाहेर गणेशोत्सव उत्साहात साजरा केलाच जातो. पण पुण्यातला गणेशोत्सवामध्ये काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यातलीच एक म्हणजे मानाच्या पाच गणपतींची परंपरा. १८९३ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजली होती आणि स्वातंत्र्यानंतरही या सणाचा उत्साह आणि चैतन्य कायम राहिला. यामध्ये काळानुरुप काही बदल निश्चितच झाले. पण १२५ पेक्षा जास्त वर्षं उलटल्यावरही मानाच्या पाच गणपतींची परंपरा पुण्यात तितक्याच बारकाईने पाळली जाते. ही पद्धत सुरु कशी झाली, मानाच्या गणपतींच्या पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा इतिहास काय आहे, हे आपण जाणून घेऊया. १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर गणपती मंडळांची संख्या वाढत गेली. असं सांगितलं जातं की दुसऱ्याच वर्षी गणपती मंडळांची संख्या १०० वर गेली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि त्याची रुपरेषा कशी असावी यावर चर्चा सुरु झाली. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत मान

गुरुजी तालीम गणपती, पुणे / Guruji Talim Ganpati, Pune

श्री गुरुजी तालीम गणपती (  पुण्याचा राजा ) मनाचा तीसरा गणपती बुधवार पेठ - पुणे पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा १३६ वे वर्ष आहे. या गणपतीला आजुन एका नावानं ओळखला जातं - ते म्हणजे " पुण्याचा राजा" . १८८७ साली भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीपासून या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पुण्यात असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरवात झाली होती. आता तालीम अस्तित्वात नाही. मूषकारूढ स्वरूपातील शाडूच्या मातीची मूळ मूर्ती १९७२ साली बनवण्यात आली होती. मंडळाचे कार्यकर्ते आणि तत्कालीन नगरसेवक श्यामसिंग परदेशी यांच्या पुढाकारातून ही मूर्ती घडवून घेतली गेली होती. दरवर्षी रंग देऊन ती मूर्ती उत्सवात ठेवली जात होती. काही वर्षापुर्वी फायबरची मूर्ती तयार करून घेण्यात आली. हीच मूर्ती आता सांगता मिरवणुकीत ठेवण्यात येते. मुर्तीसाठी दहा किलो सोन्याचे आणि वीस किलो चांदीचे दागिने कार्यकर्त्यांच्या सह