Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

संकष्टी चतुर्थी / Sankasti Chaturthi

संकष्टी चतुर्थी संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी " संकष्टी चतुर्थी " असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची थोड्क्यांत पाळ्णूक आहे. " श्रीसंकष्टहरगणपती " हे या व्रताच्या देवतेचे नांव आहे, हे व्रत करणार्‍या स्त्री अगर पुरुषाने, व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापन करावे. काहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की " आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल ! " शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण

वीरगळ / Menhir

वीरगळ  म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात. साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात. वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते. उदा. गाईसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई इ. मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्या बरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते. सर्वांत वरच्या भागात वीर योद्धा कैलास पर्वताला गेला आहे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करत आहे, असे दाखवलेले असते.युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते असे यातवून सुचवायचे असावे. काही वीरगळ हे चंद्र सूर्य यांनी अंकित असतात. आकाशात चन्द्र सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहिली असे यातून सूचित करायचे असावे. काही वीरगळ हे सतीच्या हाताने अंकित असतात. एखाद्या बलिदान केलेल्या वीराची पत्नी त्याच्यासह सती गे

श्री कार्तिकस्वामी मंदिर , पर्वती ( पुणे ) / Shri Kartikswami Temple , Parvati ( Pune )

श्रीकार्तिकस्वामी मंदिर , पर्वती  अटकेपार मराठी झेंडे नेणाऱ्या राघो भरारी म्हणजे राघोबादादा यांनी पर्वतीवर कार्तिकेयाचे मंदिर उभारले. परमप्रतापी बाजीराव पेशव्यांचे ते धाकटे चिरंजीव आणि पुण्याचे मोठ्या शहरात रूपांतर करणाऱ्या नानासाहेब पेशव्यांचे ते धाकटे बंधू. राघोबादादांचा कल थोडासा तंत्रमार्गाकडे होता. त्यांची दैनंदिन आचरणातील स्नानसंध्या - पूजाअर्चा - जपजाप्य , तांडव गणेशाची उपासना , विविध अनुष्ठाने पाहता , त्यांनी शिवपुत्र षडानन म्हणजे स्कंद किंवा कार्तिकेयाची मूर्ती स्वतंत्र देवालयात स्थापन केली. महाराष्ट्रात कार्तिकेयाची स्वतंत्र देवालये फारशी नाहीत. आपण जरी कार्तिकेयाला ब्रह्मचारी ( आणि स्त्रीद्वेष्टा ) समजत असलो आणि महाराष्ट्रात स्त्रियांनी कार्तिकेयाचं दर्शन न घेण्याची प्रथा असली , तरी दक्षिण हिंदुस्तानात सुब्रह्मण्यम किंवा मुरूगन म्हणून याच कार्तिकेयाच्या असंख्य मूर्ती व उपदेवालये किंवा देवळे आहेत. त्या षडाननाची उपासना , पूजा , दर्शन तेथील स्त्रिया नेहमी करत असतात. पर्वतीवरच ह्या कार्तिकेय मंदिराची उभारणी राघोबादादांनी करावी , हे मात्र त्यांच्या पत्नी आनंदीबाई या

तलाव / Lake

भारतात नद्यांप्रमाणेच तलावांनाही धार्मिक महत्त प्राप्त झालेले आहे. बहुसंख्य देवालयांसमोर तलाव बांधलेले आढळून येतात. असाच एक पुष्करणी तलाव हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. सामान्यतः जमिनीच्या खोलगट भागात नैसर्गिक वा कृत्रिम रीत्या झालेल्या जलसंचयास काठ, पाळ, शिल्पे इत्यादींच्या बांधकामाने वास्तुदृष्ट्या जे आकर्षक स्वरूप दिले जाते, त्यास तलाव म्हणतात. तलाव हे आकारमानाने सामान्यतः सरोवरापेक्षा लहान व विहिरीपेक्षा मोठे असतात. तलावाला, ताल, तालाब, तडाग, पुष्करणी, वापी, वापिका अशी भिन्नभिन्न नावे आहेत. यांपैकी काही नावे वैशिष्ट्यनिदर्शक आहेत. उदा : पुष्करणी म्हणजे कमळांचे तळे. यात पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या होत्या. जुन्या काळी अशा तलाव बांधण्याची पद्धत होती. तलावाचा उपयोग गावास पाणीपुरवठा, देवळास शोभा, धार्मिक कार्ये, अग्निशमन, सृष्टिशोभा, पांथस्थाची सोय अशा अनेक कारणांनी प्राचीन काळापासून होत आलेला आहे. तलावाचे बांधकाम दगडी करून तलावातील पाण्याचे शोषण कमी करता येते. ज्या भागांत मोठ्या नद्या कमी; तिथे देवळाच्या

हनुमंतांला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा कशी सुरु झाली ?

हनुमंतांला शेंदूर अर्पण करण्याची प्रथा कशी सुरु झाली ? ज्ञान, बुद्धी, शिक्षण, पराक्रम, नम्रता, लीनता, भक्तिभाव आणि सामर्थ्यासह अनेक गुण हनुमंतांच्या ठायी दिसून येतात. हनुमंतांना शेंदूर अर्पण करण्याची प्रथा प्रचलित असल्याचे दिसून येते. मात्र, ही प्रथा सुरू होण्यामागे नेमके काय कारण घडले? मारुतीरायाला शेंदूर का अर्पण केला जातो? जाणून घेऊया... हनुमानाला शेंदूर वाहण्यामागे रामायणातील एक प्रसंग कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकदा सीता देवी साजश्रुंगार करत होत्या. त्याचवेळेस हनुमान तिथे पोहोचले. सीता मातेला नमस्कार केला. सीता मातेची सात्विकता हनुमंतांना अतिशय भावली. साजश्रुंगार झाल्यावर सीताने भांगेमध्ये शेंदूराची लकीर ओढली. ते पाहून हनुमंताने कुतुहलाने विचारले, माते, हा सुद्धा तुमच्या श्रुंगाराचा एक भाग आहे का?, त्यावर हसून सीता माता म्हणाली की, हनुमंता, बाकीचे अलंकार नसले तरी चालतील, परंतु हा सर्वात महत्त्वाचा सौभाग्यलंकार आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुवासिनी भांगात शेंदूराची रेघ ओढतात. सीता मातेने दिलेल्या उत्तरावर प्रतिक्रिया देत हनुमान म्हणाले की, पतीला दीर्घायुष्य, म

पंचांग म्हणजे काय ? / What is panchang ?

पंचांग म्हणजे काय ? पंचांग या शब्दाची फोड पंच अंग अशी होते. भारतीय संस्कृतीत कालगणनेला अतिशय महत्व आहे. या कालगणनेसाठी आवश्यक असणारी पाच अंगे ज्या कोष्टकात येतात त्याला पंचांग असे सर्वसाधरणपणे म्हणतात. ही पाच अंगे खालील प्रमाणे : - तिथी : एका चांद्रमासात ३० तिथी येतात. (रोजच्या भाषेत आपण ज्याला चतुर्थी, पौर्णिमा, द्वादशी, एकदशी वगैरे म्हणतो) - वार : वार किंवा वासर (संस्कृत) हे सूर्योदयापासून पुढील सूर्योदयापर्यंतच्या गणनेस म्हणतात. जसे आजच्या भाषेत रविवार, शनिवार इ. - नक्षत्र : २७ नक्षत्रांचा उल्लेख आपल्या बोलण्यात अनेकदा येतो. चांद्रमास हे परीमाण धरल्याने त्या अनुषंगाने नक्षत्र काय हे पाहू. चंद्र आकाशातून जे भ्रमण करतो त्या वर्तुळाकृती कक्षेला क्रांतीवृत्त म्हणतात. या क्रांतीवृत्ताचे २७ समान भाग कल्पून प्रत्येक भागात येणाऱ्या विशिष्ट तारकासमूहाला नक्षत्र अशी संज्ञा आहे. खगोलशास्त्राप्रमाणे नक्षत्र हा तारकासमूहच असतो. आपल्याकडे मृग, आर्द्रा इ. नक्षत्रांचा उल्लेख विशेषतः शेतक-यांच्या संवादात येतो. - योग : चंद्रसूर्याच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास लाग

श्री विष्णु मंदिर, पर्वती ( पुणे ) / Shri Vishnu Temple, Parvati ( Pune )

श्री विष्णु मंदिर, पर्वती ( पुणे )   श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी श्री विष्णु मंदिराचे बांधकाम देवदेवेश्वर मंदिराच्या वेळेसच केले आहे. या देवालयाची बांधणी फार प्रशस्त अशी आहे. ती एखाद्या मोठ्या खोलीसारखी आहे. श्री विष्णुची स्थापना ज्येष्ठ शुध्द १० शके १६८० दि. १३ जून १७५८ रोजी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली आहे. श्री विष्णुची साडेचार फूट उंचीची अतिभव्य पूर्णाकृती मूर्ती अत्यंत सुंदर आणि देखणी असून प्रथम दर्शनीच तिची छाप पडते. श्री विष्णुच्या अत्यंत देखण्या मूर्तीपैकी ही एक आहे. काजळासारख्या काळ्याशार अशा नेपाळमधील गंडकी नदीतील शालिग्राम शिलेची ही मूर्ती आहे. श्री विष्णुची चोवीस नावे संध्येमध्ये उच्चारली जातात. भारतीय मूर्तिशास्त्राने श्री विष्णुच्या चोवीस नामांवर आधारित असे चोवीस मूर्तिविग्रह केले आहेत , भगवान विष्णु , आपल्या चार हातामध्ये शंख , चक्र , गदा , पद्म या चार वस्तू कोणत्या क्रमाने धारण करतात , त्या क्रमावर हे फरक ठरवून दिलेले आहेत. हा क्रम उजवीकडील खालचा हात , वरचा हात , नंतर डावीकडील वरचा हात , खालचा हात , असा असतो , जेव्हा विष्णु मूर्ती ग - च