Skip to main content

पंचांग म्हणजे काय ? / What is panchang ?

पंचांग म्हणजे काय ?

पंचांग या शब्दाची फोड पंच अंग अशी होते. भारतीय संस्कृतीत कालगणनेला अतिशय महत्व आहे. या कालगणनेसाठी आवश्यक असणारी पाच अंगे ज्या कोष्टकात येतात त्याला पंचांग असे सर्वसाधरणपणे म्हणतात.

ही पाच अंगे खालील प्रमाणे :

- तिथी :
एका चांद्रमासात ३० तिथी येतात. (रोजच्या भाषेत आपण ज्याला चतुर्थी, पौर्णिमा, द्वादशी, एकदशी वगैरे म्हणतो)

- वार :
वार किंवा वासर (संस्कृत) हे सूर्योदयापासून पुढील सूर्योदयापर्यंतच्या गणनेस म्हणतात. जसे आजच्या भाषेत रविवार, शनिवार इ.

- नक्षत्र :
२७ नक्षत्रांचा उल्लेख आपल्या बोलण्यात अनेकदा येतो. चांद्रमास हे परीमाण धरल्याने त्या अनुषंगाने नक्षत्र काय हे पाहू. चंद्र आकाशातून जे भ्रमण करतो त्या वर्तुळाकृती कक्षेला क्रांतीवृत्त म्हणतात. या क्रांतीवृत्ताचे २७ समान भाग कल्पून प्रत्येक भागात येणाऱ्या विशिष्ट तारकासमूहाला नक्षत्र अशी संज्ञा आहे. खगोलशास्त्राप्रमाणे नक्षत्र हा तारकासमूहच असतो. आपल्याकडे मृग, आर्द्रा इ. नक्षत्रांचा उल्लेख विशेषतः शेतक-यांच्या संवादात येतो.

- योग :
चंद्रसूर्याच्या संयुक्त गतीची बेरीज १३ अंश २० कला होण्यास लागणाऱ्या कालावधीस योग अशी संज्ञा आहे. हा गणितीय आणि कालगणनेच्या दृष्टीकोनातून मांडलेला सिद्धांत आहे. ज्योतीषशास्त्रात योगांचे जे उल्लेख येतात त्याचा या योगाशी थेट योग नाही :) नक्षत्रांच्या आरंभापासून सूर्य चंद्राचे किती कला भ्रमण झाले यानुसारही योग गणना होते. एकूण २७ योग आहेत असे मानतात.

- करण :
तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण. हे ही कालगणनचे परिमाण मानले जाते. एकूण ११ करणे मानतात. ज्योतीषांच्या बोलण्यातून सहसा विष्टी या करणाचा उल्लेख ऐकण्यात येतो. हे ७ वे करण आहे.
.
भारतीय संस्कृतीतील कोणतेही शास्त्र, विद्या किंवा ज्ञान हे केवळ एकाच विशिष्ट हेतूने मांडले जात नसे. मानवाचे सर्वांगीण कल्याण हेच त्यामागचे ध्येय असे. पंचांग हेही केवळ कालगणना हा एकमेव हेतू डोळ्यासमोर मांडलेले नसून त्यावरून योग्य अयोग्य काल, किंवा निसर्गाचे चक्र आणि त्याचे होणारे दृष्य अदृष्य परीणाम याचा विचार शास्त्रवेत्त्यांनी केलेला आहे. पराशरादि ऋषींनी या पाचही अंगांच्या सहाय्याने मानवी जीवन सुखकर कसे होईल याचा विचार केल्याचे अभ्यासावरून दिसून येईल.

माहिती आभार : शीतल रानडे 🙏

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...