Skip to main content

भीष्म पितामह / Bhishma Pitamah


गंगापुत्र देवव्रत ( भीष्म पितामह )

द्वापारयुगात हस्तिनापूरवर राजा शंतनू यांचा शासन होता. त्यांच्या पत्नीचे नाव गंगा होते. राणी गंगेला राजा शंतनूपासून पुत्रप्राप्ती झाली. " देवव्रत " - असे त्याचे नामकरण करण्यात आले. देवव्रताच्या जन्मानंतर दिलेल्या वचनाचे पालन करत राणी गंगा राजा शंतनू यांना सोडून निघून गेली.

भीष्म प्रतिज्ञा
एक दिवस गंगेत नौका विहार करत असताना राजा शंतनू यांची भेट सत्यवतीशी होते. ते तिच्या रुपावर इतके भाळतात की, सत्यवतीच्या वडिलांसमोर विवाह प्रस्ताव ठेवतात. मात्र, सत्यवतीपासून होणारा पुत्र हस्तिनापूरचा सम्राट होईल, अशी अट ते राजा शंतनू समोर ठेवतात. राजा शंतनू ही अट मान्य करत नाहीत. देवव्रताला जेव्हा ही गोष्ट समजते, तेव्हा तो आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करतो. त्यानंतर राजा शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह होतो.

इच्छा मृत्यूचे वरदान
देवव्रताने घेतलेल्या संकल्पामुळे राजा शंतनू अतिशय प्रभावित होतो आणि देवव्रताला इच्छा मरणाचे वरदान देतो. देवव्रताच्या या प्रतिज्ञेमुळे त्याला पुढे भीष्म म्हणून ओळख मिळते.

महाभारतात भीष्म
महाभारताचे युद्ध होते. त्यावेळी भीष्म पितामह कौरवांकडून युद्धास सामोरे जातात. इच्छा मरणाचे वरदान असल्यामुळे भीष्म पितामहांना कसे रोखायचे, हा प्रश्न पांडवांना पडतो. यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी ते श्रीकृष्णाकडे जातात. श्रीकृष्णाच्या विनंतीवरून पितामह भीष्म स्वतः आपल्या मृत्यूवर उपाय सांगतात.

पार्थाने वधिले भीष्माला
कोणत्याही नपुंसक किवा स्त्री समोर भीष्म पितामह शस्त्र उचलणार नाही, हे समजल्यावर भगवान श्रीकृष्ण शिखंडीला भीष्मासमोर उभे करतात. आपल्या वचनानुसार, शिखंडीला समोर पाहून भीष्म शस्त्र त्यागतात. याचाच फायदा घेऊन धनुर्धारी अर्जुन भीष्मांवर बाण चालवतो. कोणताही प्रतिकार न करता भीष्म ते प्राण अंगावर झेलतात.

भीष्मद्वादशी
माघ महिन्यातील द्वादशीला भीष्मद्वादशी म्हटले जाते. महाभारतात पितामह म्हणून ओळख असलेल्या गंगापुत्र देवव्रत म्हणजे भीष्माचार्यांनी माघ शुद्ध अष्टमी रोजी आपला देह ठेवला. मात्र, त्यांची उत्तरक्रिया माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आली. म्हणून या द्वादशीला भीष्म द्वादशी म्हटले जाते.

भीष्माष्टमी
महाभारतात ज्या दिवशी पार्थ भीष्मांवर बाणांचा वर्षाव करतात, त्यावेळी सूर्य दक्षिणायन असतो. इच्छा मरणाचे वरदान प्राप्त असल्यामुळे भीष्म आपले प्राण सोडत नाहीत. त्यानंतर अर्जुनच त्यांना शरशय्या तयार करून देतो. जेव्हा सूर्य उत्तरायण सुरू होते, तेव्हा माघ शुद्ध अष्टमीच्या दिवशी भीष्माचार्य आपले प्राणोक्रमण करतात. म्हणूनच माघ शुद्ध अष्टमीला भीष्माष्टमी असेही म्हटले जाते.

भीष्म पितामह यांची काही मंदिरे :
- नरकातारी, कुरुक्षेत्र - हरियाणा
- दारागंज, अलाहाबाद - उत्तर प्रदेश

छायाचित्र :
१ - ( मूर्ती ) स्वामी नारायण मंदिर, पुणे 
२, ३, ४ - ( पुस्तक ) भीष्म पितामह, श्यामसुंदरदास

सन्दर्भ :
- भीष्म पितामह ( चतुर्वेदी द्वारकाप्रसाद शर्मा - इंडियन प्रेस लिमिटेड )
- गंगापुत्र देवव्रताची भीष्मद्वादशी ( देवेश फडके - महाराष्ट्र टाइम्स )

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...