Skip to main content

घोरपडे घाट, शिवाजीनगर - पुणे / Ghorpade Ghat, Shivajinagar - Pune


घोरपडे घाट, शिवाजीनगर - पुणे 

छत्रपती शिवाजी पूल म्हणजे नव्या पुलावरून पूर्वेच्या बाजूला खाली नदीपात्रात डोकावून पाहिले, तर खणखणीत चिरेबंदी बांधकाम आणि त्यांच्या रेखीव पायऱ्या असे स्थापत्य ठळकपणे नजरेत भरते. अगदी नदीतील पाण्याच्या प्रवाहाजवळ हे बांधकाम नेमके कसलं ? तर याचं उत्तर आहे - ' घोरपडे घाट ' !

पेशव्यांचे सरदार यशवंतराव घोरपडे यांचे वंशज असणाऱ्या दौलतराव घोरपडे यांनी १८२१ मध्ये चार बुरुजांसह भक्कम संरक्षक भिंत, नगारखान्यासह प्रवेशद्वार, नदीच्या थेट प्रवाहापर्यंत जाणाऱ्या प्रशस्त पायऱ्या असा एक घाट बांधून घेतला. या दक्षिणाभिमुखी वास्तुरचनेच्या बुरुजांना जोडणाऱ्या भिंतीमध्ये दोन्ही बाजूंना दोन खोल्या आहेत. भिंतीवर देवड्या आहेत. इथून मुठेपर्यंत जाणाऱ्या सुबक प्रमाणशीर पायऱ्यांची रचना देखणी आहे.

पानशेत प्रलयाच्या आपत्तीत या घाटाचे दगडी बांधकाम काही ठिकाणी कोसळले. तेथे एक शिलालेख होता. तोही स्थानभ्रष्ट झाला. ' श्री येशवंत चरणितत्पर दवलवराव व पिराजीराव घोरपडे, अमिरुळ उमरा व शंबेसी निरंतर, शके १७५३ विक्रमनाम स्मशेर ( संवत्सरे ) फाल्गुन शु पंचमी रमज्यान ' असा मजकूर त्या शिलालेखात होता. फिरंगी कालगणनेप्रमाणे तो दिवस १० फेब्रुवारी १८३१, गुरुवार असा येतो. सध्या जरी या घोरपडे घाटावरचे बांधकाम कोसळले असले, तरी दोन मंदिरांच्या जोत्याचे भाग दिसू शकतात. कदाचित भांबुर्डे गावासंबंधीच ' श्री त्र्यंबकेश्वर महादेवाचे मंदिर ' असे उल्लेख मिळतात. तेच हे सांबाचे देऊळ असावे. दुसरे एक राऊळ येथे आहे. ते कदाचित घोरपडे घराण्यातील एखाद्या महनीय व्यक्तीचे स्मारक-वृंदावन असू शकेल.

पनशेत प्रलयाच्या तडाख्यात इथला सारा परिसर अगदी उद्ध्वस्त होऊन गेला. जवळचा शिवाजी तलाव ( पोहायचा तलाव ), शिवाजी उद्यान हे सारे लुप्त होऊन गेले. नदीच्या काठावर शंभर फुटी रस्ता झाला. त्या रस्त्यावरच ' मनपा बसस्थानक ' थाटले गेले. पुणे महानगरपालिकेची नव्या ढंगातील आकर्षक इमारत रस्त्यापल्याड साकारली गेली.

पुण्याचा सर्वांगीण विकास होतो आहे. त्यामध्ये शहरातील जुन्या काळच्या पाऊलखुणा नष्ट होत आहेत. घोरपडे घाटासारख्या देखण्या वास्तूची उपेक्षा न करिता, इथले वास्तू-अवशेष तसेच राखूनही हा भाग सुशोभित करणे अशक्य नाही. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक दबाव हवेत !

माहिती आभार :
वारसा प्रसारक मंडळी
( discovermh संकेतस्थळ )

Instagram - @TRAVELWALA.CHORA

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...