Skip to main content

धनुर्धारी श्रीराम मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Dhanurdhari Shree Ram Mandir, Sadashiv Peth ( Pune )


धनुर्धारी श्रीराम मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे )

पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे आराध्यदैवत प्रभु रामचंद्र आहेत. रामचंद्राच्या कृपेनेच श्री. के. वि. लिमये यांनी दिलेल्या देणगीतून या मंदिराचा हेतू साध्य झाला व १९३४ मध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. मूर्ती धनुर्धारी, संगमरवरी आणि पश्चिमाभिमुख आहे. १५x१०x१५ फूट लांबी, रुंदी, उंचीचे मंदिर २६ फूट कळसासह बांधलेले आहे. त्या वेळी अंदाजे ३,२००/- रुपये खर्च आला. मंदिरासमोरील सभा मंडप ४४ x ३३ फूट लांबी-रुंदीचा असून, श्रीमती - राधाबाई कृष्णाजी भिडे यांनी आपले पति कृ.ना. भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून १९४१ मध्ये बांधण्यात आला.


मंदिरास प्रदक्षिणामार्ग आहे. या मूर्ती रामरक्षेतील 'तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ' या १७ व्या श्लोकाच्या आधारे पांडुरंग चिमाजी पाथरकर यांनी करून दिल्या. त्या वेळी १,०००/- रुपये खर्च आला. विद्यार्थ्यांच्या पुढे अशी विद्यार्थिदशेतील मूर्ती पाहिजे म्हणून विश्वामित्र ऋषींबरोबर यज्ञरक्षणासाठी निघालेल्या धनुर्धारी राम-लक्ष्मणाची मूर्ती स्थापन केली. मूर्ती पश्चिमाभिमुख असून, संगमरवरी आहे. रामाच्या मूर्तीची उंची अंदाजे अडीच फूट असून, चार फूट उंचीच्या दगडी चौथऱ्यावर बसवलेल्या आहेत. रोज देवास पूजाअर्चा असते. रामनवमीच्या दिवशी सकाळी ११ ते १२.३० पर्यंत कीर्तन करून रामजन्म केला जातो. प्रसाद म्हणून सुंठवडाही दिला जातो. आजूबाजूचे लोक दर्शनाला आवर्जून येतात. सभा मंडपाच्या समोरील बाग व आजूबाजूची - स्वच्छता या मंदिराच्या सौंदर्यात भर घालते.

सन्दर्भ :
▪︎पुणे शहरातील मंदिर ( डॉ. शां. ग. महाजन )

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...