Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

मच्छिंद्रगड सुळका / Machhindragad Pinnacle

मच्छिंद्रगड सुळका   मुरबाड मधील पसरलेल्या आहुपे या सह्याद्रीरांगेम्ध्ये गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे दोन सुळके लक्ष वेधुन घेतात. गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ या गुरु-शिष्यांमुळे या दोनही सुळक्यांना गोरखगड आणि मच्छिंद्रगड अशी नावे देण्यात आली. हे स्थान नाथपंथीयांना अतिशय प्रिय आहे. मच्छिंद्रगडाची चढाई बिकट आणि अवघड असल्याने तांत्रिक साधनांशिवाय या किल्ल्याची चढाई करणे कठीण आहे. श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि " श्री मत्स्येंद्र " हे नाम धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या " कौलज्ञाननिर्णय " नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्य

सरदार गोदाजी राजे जगताप यांचे समाधी स्थळ, सासवड / Samadhi Of Sardar Godaji Raje Jagtap, Saswad

सरदार गोदाजी राजे जगताप यांचे समाधी स्थळ  सासवड येथे संगमेश्वर मंदिराचे उत्तर बाजुस असणाऱ्या रस्त्याचे पश्चिम बाजुस पूर्वभिमुख एक छोटीशी घुमटी आहे. ही घुमटी म्हणजे पराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांची समाधी होय. समाधी ची अवस्था फार बिकट असून बरचसे बांधकाम काळाच्या ओघात कोसळले आहे. सरदार गोदाजी जगताप म्हणजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक मानाचे पान. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींचा कार्यकाळ अनुभवलेले सरदार म्हणजे गोदाजी जगताप. सासवड परगण्याचे देशमुख, स्वराज्यासाठी झालेली खळद बेलसर लढाईचे सरदार, तसेच शेवटच्या काळात ३५००० पायदळाची सरनोबत की होती. पराक्रमी स्वामीनिष्ठ श्रीमंत गोदाजी राजे जगताप देशमुख यांची वैभवशाली कारकीर्द. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या

सासवड दर्शन / Saswad Darshan

सासवड दर्शन  सासवड महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्घ स्थळ आहे. त्याची लोकसंख्या २६,६८९ (२००१) होती. ते पुणे जिल्ह्यात पुण्याच्या आग्नेयीस सु. २७ किमी. वर कऱ्हा नदीकाठी बाबदेव व दिवे घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-सातारा रस्त्यावर वसले आहे. या गावाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही; तथापि हे बाळाजी विश्वनाथ (पहिला पेशवा) याच्या काळापासून भट घराण्याचे (पेशवे घराण्याचे) दक्षिणेकडील निवासस्थान होते. उत्तर पेशवाईतील पुरंदरे सरदारांचे हे मूळ गाव होय. या गावात पेशव्यांचा जुना वाडा असून सांप्रत तेथे तहसील कार्यालय आहे, तर पुरंदरे सरदारांचा वाडा संगमेश्वर मंदिराजवळ आहे. तो तटबंदीयुक्त आहे. कऱ्हा आणि एक उपनदी यांच्या संगमावर संगमेश्वराचे भव्य मराठाकालीन वास्तुशैलीचे मंदिर आहे.त्यांत भित्तिचित्रे, मूर्तिकाम व शिखरात चुनेगच्चीतील प्रतिमा नाहित. सासवडमध्ये इ. स. १८७९ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. नगरपालिका पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अन्य सुविधा पुरविते. पाणीपुरवठा मुख्यत्वे कऱ्हा आणि कम्बळी या नद्यांतील पाण्याद्वारे होतो; मात्र उन्हाळ्यात या नद्या आटत असल्यामुळे नगरपालिकेने जॅकवेलची व्यव

श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक ), सदाशिव पेठ - पुणे / Shrimant Nanasaheb Pehwe Samadhi, Sadashiv Peth - Pune

श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. त्यातले एक महत्त्वाचे पद म्हणजे पेशवे. पुढे ह्याच पेशव्यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावली. पेशवाईत अतिशय कर्तबगार योद्धे होऊन गेले ज्यांनी आपल्या पराक्रमाने अखंड भारतवर्षात नावलौकिक मिळवला, त्यातीलच एक बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे. नानासाहेबांना २५ जून १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र दिली. त्यांच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानाची राजकारणाची सूत्रे शनिवारवाड्यातून हलवली जायची. नानासाहेबांच्या कारकिर्दीत पुण्याच्या विस्तारासाठी नव्या पेठा उभारल्या गेल्या. पुण्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या. मुठा नदीवरचा लकडी पूल तसेच सारसबाग, हिराबाग अशासारख्या १३ बागा नानासाहेबांच्या प्रेरणेने निर्माण झाल्या. शनिवारवाड्याची बाह्य तटबंदी, उत्तराभिमुख भव्य दिल्ली दरवाजाचे बांधकाम, पर्वतीवरचे श्री देव-देवेश्वर मंदिर, नसरापूर जवळचे श्री बनेश्वर मंदिर, त्र्

रिद्धी-सिद्धी गणपती, सदाशिव पेठ - पुणे / Ridhhi-Siddhi Ganpati, Sadashiv Peth - Pune

रिद्धी सिद्धी गणपती पुण्यातील रिद्धी आणि सिद्धीसह असलेली गणपतीची मूर्ती नागनाथ पार मित्र मंडळाकडे आहे. ही सुरेख मूर्ती सदाशिव पेठेत असून, प्रसिद्ध आहे. नागनाथ पार मंडळ अगदी सुरुवातीच्या काळातील मंडळांपैकी एक ! नरहरी शेठ वासुळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. बरीच वर्षे येथे निरनिराळ्या प्रकारच्या मूर्ती बसविल्या जात असत. मोरावर बसलेला, कॅरम खेळणाऱ्या अशा विविध मूर्ती मंडळाने बसविल्या होत्या. १९८३ मध्ये मंडळाने कायमस्वरूपी मूर्ती करण्याचे ठरविले, तेव्हा मंडळाचे पुरोहित श्रीकांत काळे यांनी सांगितले, की पुराणात सांगितल्याप्रमाणे मूर्ती केली पाहिजे. त्यानुसार यशवंत वासुळकर, विजय सोमवंशी, वसंत पठारे आदींनी वेदाचार्य घैसास गुरुजींची भेट घेतली. गुरुजींनी पेणच्या मधुकर भोईर यांचे नाव सुचविले; तसेच मूर्तीचे काम सूर्योदय ते सूर्यास्त याच काळात केले जावे असे सुचविले. त्यानुसार मूर्तीची छोटी प्रतिकृती करण्यात आली. ती पसंत पडल्यावर सध्याची मूर्ती करण्यात आली. हे काम एक वर्ष सुरू होते. १९८४ मध्ये वेदाचार्य घैसास गुरुजींच्या हस्तेच विधिवत यंत्र बसवून, मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही मू

एकदंत / Ekdanta

एकदंत ( हिन्दी ) गणेश खंड में गणेश जी के एकदंत होने की एक रोचक कथा है। एक बार देवी पार्वती और भगवान शिव अपने अंतर्गृह ( गुफा ) में शयन कर रहे थे और द्वार पर गणेश जी पहरा दे रहे थे। उस समय कार्त्तवीर्य का वध करके परशुराम जी उत्साहित होकर कैलाश पर पहुंचे और तत्काल अपने इष्ट शिव जी से मिलने की इच्छा प्रकट की। लेकिन गणेश जी ने परशुराम जी को शिव जी के कक्ष मे जाने से रोक दिया। गणेश जी के रोकने पर परशुराम जी क्रोधित हो उठे और उन्होंने गणेश जी को युद्ध कीचुनौती दी। युद्ध में गणेश जी से पराजित होने पर परशुराम जी ने शिव जी द्वारा दिए परशु से गणेश जी पर प्रहार कर दिया। शिव अस्त्र होने के फलस्वरुप गणेश जी ने उसका आदरपूर्वक सामना किया और इसी के दौरान उनका बायां दांत कट गया और वह 'एकदंत' कहलाने लगे। सन्दर्भ : - गणपति खंड (  ब्रह्मवैवर्त पुराणात ) एकदंत ( मराठी ) गणेश खंडात सांगितलं गेलं आहे की, एकदा परशुराम शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात. त्यावेळी शंकर आणि पार्वती ( गुहेत ) अंतर्गृहात असतात. तेव्हा परशुरामाला अंतर्गृहात येण्यास गणपती मज्जाव करतो

कालभैरव मूर्ती / Kal-Bhairav Murti

कालभैरव मूर्ति ‘शिवपुराण’ के अनुसार कार्तिक मास के कृष्णपक्ष की अष्टमी को मध्यान्ह में भगवान शंकर के अंश से कालभैरव की उत्पत्ति हुई थी, अतः इस तिथि को काल-भैरवाष्टमी के नाम से भी जाना जाता है। पौराणिक आख्यानों के अनुसार अंधकासुर नामक दैत्य अपने कृत्यों से अनीति व अत्याचार की सीमाएं पार कर रहा था, यहाँ तक कि एक बार घमंड में चूर होकर वह भगवान शिव तक के ऊपर आक्रमण करने का दुस्साहस कर बैठा । तब उसके संहार के लिए शिव के रुधिर से कालभैरव की उत्पत्ति हुई। कुछ पुराणों के अनुसार शिव के अपमान-स्वरूप कालभैरव की उत्पत्ति हुई थी। अतः कालभैरव को शिव का अवतार माना गया है और वे शिव-स्वरूप ही हैं I कालभैरव की पत्नी देवी पार्वती जी की अवतार हैं, जिन्हें भैरवी या कालभैरवी के नाम से जाना जाता है I कालभैरव उग्र कापालिक सम्प्रदाय के देवता हैं और तंत्रशास्त्र में उनकी आराधना को ही प्राधान्य प्राप्त है। तंत्र साधक का मुख्य कालभैरव भाव से अपने को आत्मसात करना होता है। प्रस्तुत मूर्ति के दर्शन गोरखगड ट्रेक के दरम्यान की जा सकती है I यह मूर्ति यहां किसने और क्यू स्थापित की, इसका कोई ठोस सन्दर्भ तो नह

झांशीची राणी लक्ष्मीबाई / Queen Of Jhansi Rani Lakshmi Bai

झांशीची राणी लक्ष्मीबाई (१९ नोव्हेंबर १८३५–१८ जून १८५८) इंग्रजांविरुद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री म्हणजे झाशीची राणी लक्ष्मी बाई होय. १९ व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला. आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला. झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले. वेदकालीन पंचकन्यांइतक्याच श्रेष्ठ असणार्‍या या राणीच्या मृत्यूवर प्रत्यक्ष शत्रूनेही हळहळ व्यक्त केली. अवघ्या २८-२९ वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठ-मोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला. परंतु कोणत्याही संकटापासून माघारी फिरणे त्यांना माहीत नव्हते. धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत

मंदिरे कसे ओळखायचे ? / How To Identify Temples aand It's Architecture ?

मंदिरे कसे ओळखायचे ? महाराष्ट्र मधील मंदिराच्या बाबतीत बहुतांश लोक गल्लत करतात. सर्व मंदिरांना हेमाडपंथी असं संबोधित करून त्याचे कालखंड, त्याचा इतिहास सर्व काही गाळून टाकतो. यादव सम्राट रामचंद्रदेव याचा हेमाद्री हा सेनापती "सकलकरणाधिप" म्हटला जाई. १२ व्या ते १४ व्या शतकापर्यंत ह्यांचा सुवर्णकाळ.  त्याच्या काळाच्या अगोदरच्या शतकातील मंदिरे कशी बांधली असतील ? हा प्रश्न काही जनांना नक्कीच पडला पण याचे उत्तर मात्र कोणी शोधले नाही. त्याच्या अगोदर शिलाहार काळात ( ८ व्या ते १२ व्या), राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक यांच्या काळात उत्तम अशी घडीव मंदिरे बांधली गेली त्यांनाही लोक हेमाडपंथी म्हणून मोकळे होतात. त्या भागात कोणती सत्ता होती ? कोणत्या सत्तेची राजधानी किंवा त्याचा जवळ आहे का ? शिव आहे की वैष्णव ? मंग सत्ताधारी कोणते होते ? दानपत्र किंवा शिलालेख आहे का परिसरात ? हे सर्व लक्षात घेऊन कोणी अभ्यास करत नाही. दिसेल तिला हेमाडपंथी म्हणून मोकळे होतो. मुळात हेमाडपंथी ही मंदिराची शैली नाहीच. तिला आपण यादवकालीन म्हंटल पाहिजे. हेमाद्री हा कुशल सेनापती होता आणि मोठा धार्मिक ही हो

गरुड शिल्प / Garuda Shilpa

गरुड शिल्प बऱ्याच वेळेला आपण किल्ल्यांवर फिरायला जातो तेव्हा अनेक प्रकारची शिल्पे पाहतो. काही प्रवेशद्वारांवर तर काही वाडयाच्या भिंतींवर, काही भिंतींवरील चित्रांवर तर काही नाण्यांवर ! त्यातून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळून येते, ते म्हणजे ' गरुड शिल्प '. भारतवर्षात गरुडाला फार मोठे स्थान आहे. अनेक प्राचीन राज्ये आणि त्यांचे राजे गरुडाची पूजा करत असत. हिंदुस्थानात गरुडाच्या अनेक मूर्ती आढळून येतात. बघायला गेलं तर अनेक ठिकाणी गरुडाची मूर्ति अर्धमानवी आणि अर्धपक्षी स्वरूपात आढळतात. काही मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहेत तर काही उभ्या. महाराष्ट्रात वैष्णव परंपरेत तयार केलेल्या गरुडाच्या मूर्ती या दोन हातांच्या असून त्या सदैव हात जोडलेल्या स्थितीत म्हणजेच ' अंजली ' मुद्रेत असतात. बरयाच वेळा काही काही गरुडमूर्तीना चार हातसुद्धा असतात, ज्याला ‘ वैनतेय ’ म्हणतात. काही गरुड मूर्ती एक गुडघा टेकवून बसलेल्या स्थितीत पण असतात, जिथे एका हातात सर्प तर दुसर्‍या हातात सस्त्र असते. ' गुरुमादाय उड्डीनः इति गरुड ' - म्हणजेच जड वस्तू उचलून उडणारा असा तो गरुड असे गरुडाचे वर्णन