Skip to main content

श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक ), सदाशिव पेठ - पुणे / Shrimant Nanasaheb Pehwe Samadhi, Sadashiv Peth - Pune


श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक )

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. त्यातले एक महत्त्वाचे पद म्हणजे पेशवे. पुढे ह्याच पेशव्यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावली. पेशवाईत अतिशय कर्तबगार योद्धे होऊन गेले ज्यांनी आपल्या पराक्रमाने अखंड भारतवर्षात नावलौकिक मिळवला, त्यातीलच एक बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे.


नानासाहेबांना २५ जून १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र दिली. त्यांच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानाची राजकारणाची सूत्रे शनिवारवाड्यातून हलवली जायची. नानासाहेबांच्या कारकिर्दीत पुण्याच्या विस्तारासाठी नव्या पेठा उभारल्या गेल्या. पुण्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या. मुठा नदीवरचा लकडी पूल तसेच सारसबाग, हिराबाग अशासारख्या १३ बागा नानासाहेबांच्या प्रेरणेने निर्माण झाल्या. शनिवारवाड्याची बाह्य तटबंदी, उत्तराभिमुख भव्य दिल्ली दरवाजाचे बांधकाम, पर्वतीवरचे श्री देव-देवेश्वर मंदिर, नसरापूर जवळचे श्री बनेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील देवालय, वेरूळचे घृष्णेश्वर या मंदिरांची उभारणी किंवा दुरुस्ती नानासाहेबांच्या काळात झाली.


नानासाहेबांच्या कारकीर्दीत अजून एक महत्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे अफगाणिस्तान येथून हिंदुस्थानवर वारंवार होणारे हल्ले कायमचे थांबले. अफगाणिस्तान येथून होणारे हल्ले थोपविण्याची आणि थांबवायची ताकद तत्कालीन एकाही सत्तेमध्ये नव्हती. खुद्द मोगल बादशाह,  जाट,  रोहीले, शीख, राजपूत अशा सर्व सत्ता निष्प्रभ बनल्या होत्या. तेव्हा नानासाहेबांनी आपला चुलत बंधू सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि आपला थोरला मुलगा विश्वासरावच्या अधिपत्याखाली प्रचंड मराठी फौज उत्तरेत पाठवली. अहमदशहा अब्दाली आणि नादिरशहा यांच्या बलाढ्य सेनेशी मराठ्यांची पानिपतात लढाई झाली. ज्यात मराठ्यांचा जरी पराभव झाला, तरी पुढील कित्येक वर्ष तेथून हिंदुस्थानात परत एकही हल्ला झाला नाही.

नानासाहेब पेशव्यांच्या कारकीर्दीत मराठी साम्राज्याची सत्ता, वैभव, दरारा सारेच कळसाला पोचले होते. त्यांचा मृत्यू २३ जून १७६१ रोजी पर्वतीवरील पेशव्यांच्या वाड्यात झाला. तिथे त्यांचे एक सुंदर स्मारक आहे आणि दुसरे मुठा नदी काठी जिथे त्यांचा दहनविधी झाला.

पूना हॉस्पिटलच्या समोर रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या पायऱ्या उतरून खाली नदीपात्रात उतरले की समोर एका चौथर्यावर असलेली मेघडंबरी दिसते. हेच ते स्मारक होय.

संदर्भ :
मुठेकाठचे पुणे ( प्र. के. घाणेकर )

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...