Skip to main content

श्री भेकराई माता मंदिर, भेकराईनगर, हडपसर - पुणे / Shree Bhekrai Mata Mandir, Bhekrai Nagar, Hadapsar - Pune


श्री भेकराई माता मंदिर
भेकराईनगर, हडपसर - पुणे

येडाई, गांजाई, मळाई, फिरंगाई अशी देवीची नावे आपण सतत ऐकत असतो. पण ही नावे अशी का पडली किवा का प्रचलित झाली हे आपल्याला माहित नसते. अशाच प्रकारचे अजून एक नाव म्हणजे भेकराई. वाघजाई ह्या नावामध्ये "वाघ" शब्द येतो; म्हणून पडल्याचे आपण ऐकतो; तसेच भेकराई हे भेकर म्हणजे हरिण यावरून पडले असावे काय?

भेकर हे सारंग कुळातील हरिण होय. हडपसरकडून सासवडकडे जाताना उजव्या बाजूस आधी तुकाई मातेचे मंदिर लागते. तेथून सासवडकडे जाऊ लागले, की बस डेपोच्या जवळच भेकराई देवीचे मंदिर आहे. हा परिसर भेकराईनगर म्हणूनच ओळखला जातो. ज्या टेकडीवर तुकाइचे मंदिर आहे, त्याच टेकडीवर भेकराईचेही मंदिर आहे. तुकाईच्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात, तर भेकराईचे मंदिर तेवढ्या उंचीवर नसल्याने मंदिरापर्यंत थेट गाडीने जातात येते. हे मंदिर प्रशस्त आहे. येथे देवीची दोन हातांची दोन ते अडीच फूट उंच मूर्ती आहे. देवी उभी असून, उजव्या हाताखाली मानवाकृती आहे; परंतु मूर्तीचे स्वरूप व ती मानवाकृती कोणाची हे स्पष्ट होत नाही. देवीची मूर्ती शेंदूरलिप्त आहे. देवीच्या डाव्या व उजव्या बाजूस ही शेंदुरलिप्त प्रतिमा आहेत. याही प्रतिमांचे स्वरूप स्पष्ट होत नाही. या स्थानाविषयी मुकुंद उर्फ नाना हरपळे यांनी सांगितले, की काही दशकांपूर्वीपर्यंत देवीची मूर्ती झाडाखाली उघड्यावर होती. त्यानंतर पत्र्याचे मंदिर बांधण्यात आले. सध्याचे मंदिर १५ वर्षापूर्वी बांधले आहे. अलीकडील काळात गाभाऱ्यात पांडुरंग-रुक्मिणी या मूर्तीही स्थापन करण्यात आल्या आहेत. येथे नवरात्र हा मुख्य उत्सव असतो.

माहिती आभार :
▪︎ मंदार लवाटे ( maharashtratimes.com )

Instagram :
▪︎ @punesehai
▪︎ @travelwala.chora

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...