Skip to main content

Posts

Showing posts from 2021

रास्ते वाडा, सोमवार पेठ - पुणे / Raaste Wada, Somwar Peth - Pune

रास्ते वाडा, सोमवार पेठ ( पुणे ) दारूवाला पुलावरून डावीकडे वळून स्टेशनकडे जाताना थोडे पुढे गेल्यावर समोरच एक भव्य वाडा दिसतो. हत्ती आत जाईल इतके मोठे प्रवेशद्वार असलेला हा वाडा तीन मजली असून, छपरावर कौले आहेत. वाड्याच्या एका बाजूस आगरकर हायस्कूल असून, तेथपासून अपोलो टॉकीजच्या चौकापर्यंत व मागे के.ई.एम्. हॉस्पिटलपर्यंत वाडा पसरलेला आहे. पेशवाईतील प्रमुख सरदार आनंदराव रास्ते यांचा हा वाडा. सध्या वाड्याच्या दर्शनी भागात तळमजल्यावर काही दुकाने असून, दुसऱ्या मजल्यावर प्राथमिक शाळेची पाटी दिसते. पेशवाई जाऊन शतके उलटली, सरंजामतनखा जाऊनही दशके उलटली. त्यामुळे रास्ते सरदारांच्या वंशजांना बदलत्या काळाबरोबर बदलणे भाग पडले. साहजिकच त्यांनी वाड्याच्या दक्षिणेकडील बाजूस म्हणजे अपोलोकडून के.ई.एम. कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस ओनरशिप फ्लॅट उठविले. पुणे शहराच्या पूर्व भागातील या वाड्याला पूर्वीच्या काळी आंबील ओढा वळवून पाणीपुरवठा केलेला होता. वाड्याच्या आत सरदार रास्त्यांनी बांधलेले श्रीरामाचे सुरेख देऊळ आहे. हाच ' रास्त्यांचा राम '. वाड्याप्रमाणेच रास्ते घराण्याचा इतिहासही पाहण्

सुधागड / Sudhagad

सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व सुधागड हा लोणावळा डोंगर रांगांमधील किल्ला रायगड जिल्ह्यातील पाली गावापासून फक्त १० किमीवर आहे. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर असून गड विस्ताराने फारच मोठा आहे. या प्राचीन गडाला भोरपगड असेही म्हणत असत. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणावळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. एखाद्या मोठ्या सत्तेखाली या गडाची मूळ जडणघडण झाली असावी असा अंदाज असून या किल्ल्याने शिलाहार, यादव, बहमनी, मुघल अशा राजसत्ता पाहिल्या. व नंतर इ.स. १६४८ साली हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला. शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. नारो मुकुंद यांनी शिवरायांना सुधागडला हिंदवी स्वराज्याची राजधानी करावी असे सुचविले होते. मात्र महाराजांनी रायगडाची निवड करून सुधागडाच्या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. महाराजांच्य

Bhunga House, Kutch - Gujarat

Bhunga House - Gujarat After the devastating earthquake of 1819, the people of Kutch came up with an innovative circular design of bhungas to minimize the damage to their lives as well as properties. The reworked design of bhungas that is about 200 years old stood very firm during the earthquake of 2001 when it was very close to the epicentre. Bhungas are traditional houses, a unique type of round mud hut identified with the Kutch desert areas of Gujarat. The houses are circular walled with thatched roof. These beautiful houses are built using mud and other locally available materials like clay, bamboo, timber etc. These austere huts are decorated with various embellishments that showcase the life and culture of the people of Kutch. They are mainly found in the desert islands in the northern part of Kutch like Banni and Paccham. These houses are commonly called as ‘Architecture without Architect’ because of the superior architectural knowledge gained by the lo

प्रश्न आहे पर्वतीवरील झोपडपट्टीचा

प्रश्न आहे पर्वतीवरील झोपडपट्टीचा पर्वतीचं सौंदर्य आणि आरोग्यपूर्ण वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरलेली झोपडपट्टी हटविण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्या झोपड्यांच्या स्थलांतरासाठी बिबवेवाडीत नवी घरं उभारण्याची योजना आखली गेली. पुढे ही नवी घरकुलं उभी राहिली. पण पर्वतीवरील झोपड्या तशाच राहिल्या. अशा झोपडपट्ट्या म्हणजे निवडणुकीतील मतपेट्याच ठरतात, असा लोकप्रतिनिधींचा समज असल्यामुळे हे झोपडपट्यारूपी गलिच्छ वस्तीचं गालबोट दूर होऊ शकले नाही. आता तर ही वस्ती वाढतेच आहे. इतरही अनेक टेकड्यांवर त्याची कागद काच लागण झाली आहे. पर्वतीच्या उतारावरील कबुतरांच्या ढाबळी, पत्रा-पुठ्ठा-भंगार गोळा करणाऱ्यांची गोदामं यांनीही अधूनमधून बस्तान मांडण्याचा शिरस्ता ठेवला आहे. वनीकरण झालेल्या भागातील झाडांची चोरटी तोड, पर्वतीवर नेणाऱ्या प्रशस्त पायऱ्यांच्या दुतर्फा असलेले लोखंडी कठडे चोरीला जाणे अशा गोष्टी वारंवार घडताना दिसतात. पर्वतीचे डोंगरउतार श्रीदेवदेवेश्वर संस्थानच्या मालकीचे नाहीत. सरकारी वा खाजगी डोंगरउतारावर वसलेल्या नि वाढत जाणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या निर्मूलनासाठी ते कायदेशीर कार्यवाही करू शकत ना

पर्वती लेणे, पर्वती टेकडी - पुणे / Parvati Caves, Parvati Hills - Pune

पर्वती लेणे, पर्वती टेकडी ( पुणे ) पर्वती टेकडीच्या दक्षिण उतारावर शाहू महाविद्यालयाजवळ आणि गृहनिर्माण मंडळाच्या नव्या वसाहतीच्या मागे एक अतिशय सामान्य खोदीव गुहा आहे. गुहेमध्ये खूप पाणी साचले आहे. गुहेसमोरील खोदीव प्राकारावरून येथे आणखी खोदकाम करण्याची मूळ योजना असावी असे वाटते. याच्या कालखंडाबाबत निश्चितपणे कोणतेही विधान करता येत नाही. वटवाघळांची मोठी वसाहतच या लेण्याचा आश्रय घेऊन राहते आहे. दोन बुटके खांब, त्यांवर तोलून धरलेले छत, त्यांना मदतनीस म्हणून आणखी ४-५ ओबडधोबड खांब अशा या खोदीव गुहेची लांबी ११ मीटर व रुंदी ६ मीटर तसेच उंची ७.५ मीटर भरते. जानेवारी १९७६ मध्ये शाहू महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने या लेण्यातील गाळ काढणे, साचलेले पाणी उपसून टाकणे अशी स्वच्छता मोहीम पार पाडली होती. त्या गाळात व दगडधोंड्यांच्या मलब्यात कोणतेही प्राचीन अवशेष मिळाले नव्हते. पुणे नगर संशोधन वृत्त, खंड १, पान ७३ वर या लेण्याचा उल्लेख आहे - " गुंफा- ( पर्वतीच्या ) दक्षिणेच्या बाजूस टेकडीच्या पोटात पूर्वाभिमुख एक गुंफा आहे. तिथे आता तुडुंब पाणी आहे. श्री. वि

तुळजा लेणी, जुन्नर ( पुणे ) / Tulja Caves, Junnar ( Pune )

तुळजा लेणी, जुन्नर ( पुणे ) जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी समूह. या लेणी जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी. अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. मध्ययुगात येथील लेणे क्र. ४ मध्ये तुळजाभवानीची मूर्ती स्थापन केल्याने या संपूर्ण टेकडीला ‘तुळजा टेकडी’ असे संबोधले जाऊ लागले. तुळजा लेणी उत्तराभिमुख असून त्यांत एकूण तेरा लेणी आहेत. यांपैकी लेणे क्र. ३ हे चैत्यगृह; तर उर्वरित विहार व इतर सामान्य खोल्या आहेत. त्यांतील बहुतेकांची प्रवेशद्वारे काळाच्या ओघात तुटलेली आहेत. यांशिवाय तीन अपूर्ण लेणी व दोन पाण्याची टाकी या लेणी समूहात खोदली आहेत. या लेण्यांत अद्यापि एकही शिलालेख आढळलेला नाही. लेणे क्र. १ सामान्य खोली आहे. लेणे क्र. २ एक विहार असून आत चौरस मंडप आहे. लेणे क्र. ३ हे एक वर्तुळाकार चैत्यगृह असून हे या समूहातील वैशिष्ट्यपूर्ण लेणे आहे. या लेण्याच्या मध्यभागी एक स्तूप आहे. स्तूपाचा खालील भाग गोलाकार असून त्यावर  ‘अंड’ आहे. अंडावर हर्मिका तसेच चौरस खाच होती, ती आता नष्ट झालेली आहे. स्तूपाच्या भोवती साधे बारा अष्टकोनी स्तंभ आहेत. विशे

भूत लेणी, जुन्नर ( पुणे ) / Bhut Caves, Junnar ( Pune )

भूत लेणी, मानमोडी डोंगर ( टेकडी ) - जुन्नर ( पुणे ) जुन्नर भागातील मानमोडी डोंगरात असणारा हा आणखी एक भूत लेणी समूह. अंबा-अंबिका लेणी समूह पाहून झाल्यावर डावीकडे एक पायवाट गर्द झाडीत जाते. सुमारे १५ मिनिटांत ही पायवाट आपल्याला भूत लेणी समुहाकडे घेऊन येते. लांबून दिसणारी शिल्पे, मोठी मधाची पोळी आणि मधमाशांच्या आवाज यांनी प्रथमदर्शनीच वातावरण गंभीर बनवते. भूत लेणी समूह हा १६ बौद्ध लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे. लेणे क्र. ३७ - इथे बाहेर एक पोढी , पाण्याचे टाके आढळते, त्यावर एक ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे, त्याचा अर्थ, " कुमीय यांची कन्या सुलसा हिने या पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले " असा आहे. लेणे क्र. ३८ - हा विहार असून, चौरस मंडप व दोन खोल्या आहेत. पुढे जमिनीत पाण्याची लहान टाकी कोरलेली आहेत. लेणे क्र. ३९ - हा ही विहार असून ३ स्तंभ व २ अर्धस्तंभ असून, ५ अपूर्ण खोल्या आहेत. समोर पाण्याचे लहान टाके आहे. लेणी क्र. ४० - खरंतर या लेणी समुहाकडे आल्यावर प्रथमदर्शनी आपले लक्ष वेधणारी ही प्रमुख लेणी, इथे चैत्यगृह आहे. समोर दर्शनी भाग ११ मीटर उंच आहे, तो

भीमाशंकर लेणी, जुन्नर ( पुणे ) / Bhimashankar Caves, Junnar ( Pune )

भीमाशंकर लेणी, मानमोडी टेकडी, जुन्नर ( पुणे ) सातवाहनकालीन बौद्ध धर्मातील थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी संख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठा लेणी–समूह आहे. जुन्नर हे ठिकाण पुण्यापासून ९० किमी अंतरावर कुकडी नदीकिनारी वसले असून अवतीभोवती सुमारे आठ-दहा किमी. च्या परिघात मानमोडी, शिवनेरी, मांगणी, हातकेश्वर, लेण्याद्री, दुधारे इत्यादी टेकड्यांनी वेढलेले आहे. यांतील काही टेकड्यांत प्राचीन बौद्ध लेणी खोदली आहेत. जुन्नर लेणींचे साधारणतः नऊ समूह पाडता येतात. असाच एक समूह मानमोडी टेकडीवर आहे, ज्याचं नाव भीमाशंकर लेणी समूह आहे. या टेकडीत कुल तीन लेण्यांचे समूह आहेत. बाकीचे दोन लेण्या म्हणजे अंबा-अंबिका लेणी व भूतलिंग लेणी होय. या समूहात महत्त्वाच्या १७ लेणी असून इतर आठ अपूर्ण लेणी आहेत. त्यातील लेणी क्रमांक २ हे चैत्यगृह असून बाकी सामान्य खोल्या आहेत. या समूहात १३ पोढीही आहेत. लेणी क्रमांक १ च्या दर्शनी भागात, मध्यभागी दोन स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ आहेत. याच्या मागे ओसरी असून मागील भिंतीत तीन खोल्या आहेत. लेणी क्रमांक २ या चैत्यगृहाच्या दर्शनी भागाची उंची १२.२

सह्याद्री / Sahyadri

सह्याद्री   पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी. दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे. सह्याद्रीची उत्तर-दक्षिण लांबी सु. १,६०० किमी. असून सस. पासून सरासरी उंची सु. १,२०० मी. आहे. पर्वताचा पश्र्चिम उतार तीव्र तर पूर्वेकडे पठारी भागाकडील उतार तुलनेने मंद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या राज्यांतील सु. ६०,००० चौ. किमी. क्षेत्र सह्याद्रीच्या श्रेण्यांनी व्यापले आहे. पर्वताचा सर्वाधिक विस्तार कर्नाटक राज्यात आहे. भूवैज्ञानिक इतिहास  सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्य

खापरखवल्या / Shieldtail

खापरखवल्या ( Shieldtail ) अतिशय दुर्मिळ असा हा खापरखवल्या जातीचा साप आहे. हा बिन विषारी असून हा पावसाळ्यात जास्त आढळतो. सह्याद्रीत भटकंती करताना कधी ना कधी तुम्हाला ह्या प्रजातिचा दर्शन झालाच असणारे. ह्या सापला इंग्रजीत " Phipson's Shieldtail " अस म्हणतात. हा साप महाराष्ट्रात मुंबई, पुण्या जवळ डोंगर भागात तसेच सातारा, महाबळेश्वर आणि कर्नाटकच्या काही भागात आढळतो. या सापाचा फीप्संस, एलोथ, मोठ्या खवल्याचा खापरखवल्या, महाबळेश्वरी खापरखवल्या अशा चार उपजाती आहेत. हा साप जास्तीत जास्त १ ते २ फूट एवढा असतो. डोक्यावर केशरी रंगाचा किवा गडद पिवळ्या रंगाचा डाग असतो. मानवीय हस्तक्षेप, अमाप वृक्षतोड आणि निसर्गाच्या ऱ्हासामुळे सापांच्या अनेक प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. - संतोष पांडेय  Instagram : ©TRAVELWALA.CHORA

चतु:श्रुंगी माता मंदिर, पुणे / Chaturshingi Mata Temple, Pune

चतु:श्रुंगी माता मंदिर, पुणे नाशिकजवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी. पेशवाईतील प्रसिद्ध सावकार दुलभशेठ या देवीचा मोठा भक्त होता व तो वणीला दर्शनास नेहेमी जात असे. कालांतराने त्याचे वय झाल्यावर देवीने त्याच्यासाठी तत्कालीन पुण्यानजीक प्रकट होत असल्याचा दृष्टांत त्यास दिला. परंतु वेळेआधीच दुलभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यास आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दुलभशेठने मंदिर बांधले. पुण्यात उत्तर पेशवाईत दुलभशेठने नाणी पडण्याचा म्हणजेच टाकसाळीचा मक्ता घेतला होता, तसेच नाशिकजवळही दुलभशेठची एक टाकसाळ होती. दुलभशेठने पुण्यात एक धर्मशाळा बांधली व तेथे कालियामर्दनाची मूर्ती स्थापन केली. लक्ष्मीरस्त्यावर सतरंजीवाला चौकानजीक ही मूर्ती आजही पाहायला मिळते. चतु:श्रुंगी हे पूर्वीपासून पुणेकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. नवरात्रात गावातून तालीमबाज नारळाचे तोरण घेऊन चतु

कास पठार, सातारा / Kaas Plateau, Satara

कास पठार   पश्चिम घाटाची ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळख असलेले कास पठार हे सातारा शहरापासून २५ किमी वर आहे. कास पठारावर जून ते ऑक्टोबर या कालावधीत फुले येतात. सतत बदलते हवामान आणि तापमान यांमुळे येथे फुलणारी फुले आकाराने लहान असतात. त्यांच्या पुनरुत्पादनाची शक्यता जास्तीत जास्त असावी, यासाठी फुलांमध्ये कोट्यवधी परागकणांची निर्मिती होत असते. त्यामुळे एका वेळेस एका जातीची अगणित फुले फुलतात आणि फुलांचा एकाच रंगाचा गालिचा पसरल्यासारखा दिसतो. कास पठारावर आठशेपेक्षा जास्त वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यांपैकी ४७ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेच्या (यूनेस्कोच्या) पथकाने ऑक्टोबर २०१० मध्ये कास पुष्प पठाराला भेट दिली होती. येथील अलौकिक जैवविविधता पाहून या परिसराला ‘जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा (World Natural Heritage Site) चा दर्जा बहाल करण्यात आला. या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वन खात्याने व निसर्गप्रेमी स्वयंसेवी संस्थांनी विविध उपाय योजले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालण्यात आले

मच्छिंद्रगड सुळका / Machhindragad Pinnacle

मच्छिंद्रगड सुळका   मुरबाड मधील पसरलेल्या आहुपे या सह्याद्रीरांगेम्ध्ये गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे दोन सुळके लक्ष वेधुन घेतात. गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ या गुरु-शिष्यांमुळे या दोनही सुळक्यांना गोरखगड आणि मच्छिंद्रगड अशी नावे देण्यात आली. हे स्थान नाथपंथीयांना अतिशय प्रिय आहे. मच्छिंद्रगडाची चढाई बिकट आणि अवघड असल्याने तांत्रिक साधनांशिवाय या किल्ल्याची चढाई करणे कठीण आहे. श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि " श्री मत्स्येंद्र " हे नाम धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या " कौलज्ञाननिर्णय " नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्य

सरदार गोदाजी राजे जगताप यांचे समाधी स्थळ, सासवड / Samadhi Of Sardar Godaji Raje Jagtap, Saswad

सरदार गोदाजी राजे जगताप यांचे समाधी स्थळ  सासवड येथे संगमेश्वर मंदिराचे उत्तर बाजुस असणाऱ्या रस्त्याचे पश्चिम बाजुस पूर्वभिमुख एक छोटीशी घुमटी आहे. ही घुमटी म्हणजे पराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप यांची समाधी होय. समाधी ची अवस्था फार बिकट असून बरचसे बांधकाम काळाच्या ओघात कोसळले आहे. सरदार गोदाजी जगताप म्हणजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक मानाचे पान. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज या तिन्ही छत्रपतींचा कार्यकाळ अनुभवलेले सरदार म्हणजे गोदाजी जगताप. सासवड परगण्याचे देशमुख, स्वराज्यासाठी झालेली खळद बेलसर लढाईचे सरदार, तसेच शेवटच्या काळात ३५००० पायदळाची सरनोबत की होती. पराक्रमी स्वामीनिष्ठ श्रीमंत गोदाजी राजे जगताप देशमुख यांची वैभवशाली कारकीर्द. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या

सासवड दर्शन / Saswad Darshan

सासवड दर्शन  सासवड महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्घ स्थळ आहे. त्याची लोकसंख्या २६,६८९ (२००१) होती. ते पुणे जिल्ह्यात पुण्याच्या आग्नेयीस सु. २७ किमी. वर कऱ्हा नदीकाठी बाबदेव व दिवे घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-सातारा रस्त्यावर वसले आहे. या गावाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही; तथापि हे बाळाजी विश्वनाथ (पहिला पेशवा) याच्या काळापासून भट घराण्याचे (पेशवे घराण्याचे) दक्षिणेकडील निवासस्थान होते. उत्तर पेशवाईतील पुरंदरे सरदारांचे हे मूळ गाव होय. या गावात पेशव्यांचा जुना वाडा असून सांप्रत तेथे तहसील कार्यालय आहे, तर पुरंदरे सरदारांचा वाडा संगमेश्वर मंदिराजवळ आहे. तो तटबंदीयुक्त आहे. कऱ्हा आणि एक उपनदी यांच्या संगमावर संगमेश्वराचे भव्य मराठाकालीन वास्तुशैलीचे मंदिर आहे.त्यांत भित्तिचित्रे, मूर्तिकाम व शिखरात चुनेगच्चीतील प्रतिमा नाहित. सासवडमध्ये इ. स. १८७९ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. नगरपालिका पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अन्य सुविधा पुरविते. पाणीपुरवठा मुख्यत्वे कऱ्हा आणि कम्बळी या नद्यांतील पाण्याद्वारे होतो; मात्र उन्हाळ्यात या नद्या आटत असल्यामुळे नगरपालिकेने जॅकवेलची व्यव

श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक ), सदाशिव पेठ - पुणे / Shrimant Nanasaheb Pehwe Samadhi, Sadashiv Peth - Pune

श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी ( स्मारक ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. त्यातले एक महत्त्वाचे पद म्हणजे पेशवे. पुढे ह्याच पेशव्यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासात महत्वाची भूमिका बजावली. पेशवाईत अतिशय कर्तबगार योद्धे होऊन गेले ज्यांनी आपल्या पराक्रमाने अखंड भारतवर्षात नावलौकिक मिळवला, त्यातीलच एक बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे. नानासाहेबांना २५ जून १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र दिली. त्यांच्या काळात संपूर्ण हिंदुस्थानाची राजकारणाची सूत्रे शनिवारवाड्यातून हलवली जायची. नानासाहेबांच्या कारकिर्दीत पुण्याच्या विस्तारासाठी नव्या पेठा उभारल्या गेल्या. पुण्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या. मुठा नदीवरचा लकडी पूल तसेच सारसबाग, हिराबाग अशासारख्या १३ बागा नानासाहेबांच्या प्रेरणेने निर्माण झाल्या. शनिवारवाड्याची बाह्य तटबंदी, उत्तराभिमुख भव्य दिल्ली दरवाजाचे बांधकाम, पर्वतीवरचे श्री देव-देवेश्वर मंदिर, नसरापूर जवळचे श्री बनेश्वर मंदिर, त्र्

रिद्धी-सिद्धी गणपती, सदाशिव पेठ - पुणे / Ridhhi-Siddhi Ganpati, Sadashiv Peth - Pune

रिद्धी सिद्धी गणपती पुण्यातील रिद्धी आणि सिद्धीसह असलेली गणपतीची मूर्ती नागनाथ पार मित्र मंडळाकडे आहे. ही सुरेख मूर्ती सदाशिव पेठेत असून, प्रसिद्ध आहे. नागनाथ पार मंडळ अगदी सुरुवातीच्या काळातील मंडळांपैकी एक ! नरहरी शेठ वासुळकर यांनी या मंडळाची स्थापना केली. बरीच वर्षे येथे निरनिराळ्या प्रकारच्या मूर्ती बसविल्या जात असत. मोरावर बसलेला, कॅरम खेळणाऱ्या अशा विविध मूर्ती मंडळाने बसविल्या होत्या. १९८३ मध्ये मंडळाने कायमस्वरूपी मूर्ती करण्याचे ठरविले, तेव्हा मंडळाचे पुरोहित श्रीकांत काळे यांनी सांगितले, की पुराणात सांगितल्याप्रमाणे मूर्ती केली पाहिजे. त्यानुसार यशवंत वासुळकर, विजय सोमवंशी, वसंत पठारे आदींनी वेदाचार्य घैसास गुरुजींची भेट घेतली. गुरुजींनी पेणच्या मधुकर भोईर यांचे नाव सुचविले; तसेच मूर्तीचे काम सूर्योदय ते सूर्यास्त याच काळात केले जावे असे सुचविले. त्यानुसार मूर्तीची छोटी प्रतिकृती करण्यात आली. ती पसंत पडल्यावर सध्याची मूर्ती करण्यात आली. हे काम एक वर्ष सुरू होते. १९८४ मध्ये वेदाचार्य घैसास गुरुजींच्या हस्तेच विधिवत यंत्र बसवून, मूर्तीची स्थापना करण्यात आली. ही मू

एकदंत / Ekdanta

एकदंत ( हिन्दी ) गणेश खंड में गणेश जी के एकदंत होने की एक रोचक कथा है। एक बार देवी पार्वती और भगवान शिव अपने अंतर्गृह ( गुफा ) में शयन कर रहे थे और द्वार पर गणेश जी पहरा दे रहे थे। उस समय कार्त्तवीर्य का वध करके परशुराम जी उत्साहित होकर कैलाश पर पहुंचे और तत्काल अपने इष्ट शिव जी से मिलने की इच्छा प्रकट की। लेकिन गणेश जी ने परशुराम जी को शिव जी के कक्ष मे जाने से रोक दिया। गणेश जी के रोकने पर परशुराम जी क्रोधित हो उठे और उन्होंने गणेश जी को युद्ध कीचुनौती दी। युद्ध में गणेश जी से पराजित होने पर परशुराम जी ने शिव जी द्वारा दिए परशु से गणेश जी पर प्रहार कर दिया। शिव अस्त्र होने के फलस्वरुप गणेश जी ने उसका आदरपूर्वक सामना किया और इसी के दौरान उनका बायां दांत कट गया और वह 'एकदंत' कहलाने लगे। सन्दर्भ : - गणपति खंड (  ब्रह्मवैवर्त पुराणात ) एकदंत ( मराठी ) गणेश खंडात सांगितलं गेलं आहे की, एकदा परशुराम शंकराची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावर जातात. त्यावेळी शंकर आणि पार्वती ( गुहेत ) अंतर्गृहात असतात. तेव्हा परशुरामाला अंतर्गृहात येण्यास गणपती मज्जाव करतो

कालभैरव मूर्ती / Kal-Bhairav Murti

कालभैरव मूर्ति ‘शिवपुराण’ के अनुसार कार्तिक मास के कृष्णपक्ष की अष्टमी को मध्यान्ह में भगवान शंकर के अंश से कालभैरव की उत्पत्ति हुई थी, अतः इस तिथि को काल-भैरवाष्टमी के नाम से भी जाना जाता है। पौराणिक आख्यानों के अनुसार अंधकासुर नामक दैत्य अपने कृत्यों से अनीति व अत्याचार की सीमाएं पार कर रहा था, यहाँ तक कि एक बार घमंड में चूर होकर वह भगवान शिव तक के ऊपर आक्रमण करने का दुस्साहस कर बैठा । तब उसके संहार के लिए शिव के रुधिर से कालभैरव की उत्पत्ति हुई। कुछ पुराणों के अनुसार शिव के अपमान-स्वरूप कालभैरव की उत्पत्ति हुई थी। अतः कालभैरव को शिव का अवतार माना गया है और वे शिव-स्वरूप ही हैं I कालभैरव की पत्नी देवी पार्वती जी की अवतार हैं, जिन्हें भैरवी या कालभैरवी के नाम से जाना जाता है I कालभैरव उग्र कापालिक सम्प्रदाय के देवता हैं और तंत्रशास्त्र में उनकी आराधना को ही प्राधान्य प्राप्त है। तंत्र साधक का मुख्य कालभैरव भाव से अपने को आत्मसात करना होता है। प्रस्तुत मूर्ति के दर्शन गोरखगड ट्रेक के दरम्यान की जा सकती है I यह मूर्ति यहां किसने और क्यू स्थापित की, इसका कोई ठोस सन्दर्भ तो नह

झांशीची राणी लक्ष्मीबाई / Queen Of Jhansi Rani Lakshmi Bai

झांशीची राणी लक्ष्मीबाई (१९ नोव्हेंबर १८३५–१८ जून १८५८) इंग्रजांविरुद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री म्हणजे झाशीची राणी लक्ष्मी बाई होय. १९ व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला. आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला. झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी १९४३ च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले. वेदकालीन पंचकन्यांइतक्याच श्रेष्ठ असणार्‍या या राणीच्या मृत्यूवर प्रत्यक्ष शत्रूनेही हळहळ व्यक्त केली. अवघ्या २८-२९ वर्षांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर मोठ-मोठ्या संकटांचा सामना राणी लक्ष्मीबाईंना करावा लागला. परंतु कोणत्याही संकटापासून माघारी फिरणे त्यांना माहीत नव्हते. धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत

मंदिरे कसे ओळखायचे ? / How To Identify Temples aand It's Architecture ?

मंदिरे कसे ओळखायचे ? महाराष्ट्र मधील मंदिराच्या बाबतीत बहुतांश लोक गल्लत करतात. सर्व मंदिरांना हेमाडपंथी असं संबोधित करून त्याचे कालखंड, त्याचा इतिहास सर्व काही गाळून टाकतो. यादव सम्राट रामचंद्रदेव याचा हेमाद्री हा सेनापती "सकलकरणाधिप" म्हटला जाई. १२ व्या ते १४ व्या शतकापर्यंत ह्यांचा सुवर्णकाळ.  त्याच्या काळाच्या अगोदरच्या शतकातील मंदिरे कशी बांधली असतील ? हा प्रश्न काही जनांना नक्कीच पडला पण याचे उत्तर मात्र कोणी शोधले नाही. त्याच्या अगोदर शिलाहार काळात ( ८ व्या ते १२ व्या), राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक यांच्या काळात उत्तम अशी घडीव मंदिरे बांधली गेली त्यांनाही लोक हेमाडपंथी म्हणून मोकळे होतात. त्या भागात कोणती सत्ता होती ? कोणत्या सत्तेची राजधानी किंवा त्याचा जवळ आहे का ? शिव आहे की वैष्णव ? मंग सत्ताधारी कोणते होते ? दानपत्र किंवा शिलालेख आहे का परिसरात ? हे सर्व लक्षात घेऊन कोणी अभ्यास करत नाही. दिसेल तिला हेमाडपंथी म्हणून मोकळे होतो. मुळात हेमाडपंथी ही मंदिराची शैली नाहीच. तिला आपण यादवकालीन म्हंटल पाहिजे. हेमाद्री हा कुशल सेनापती होता आणि मोठा धार्मिक ही हो

गरुड शिल्प / Garuda Shilpa

गरुड शिल्प बऱ्याच वेळेला आपण किल्ल्यांवर फिरायला जातो तेव्हा अनेक प्रकारची शिल्पे पाहतो. काही प्रवेशद्वारांवर तर काही वाडयाच्या भिंतींवर, काही भिंतींवरील चित्रांवर तर काही नाण्यांवर ! त्यातून एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळून येते, ते म्हणजे ' गरुड शिल्प '. भारतवर्षात गरुडाला फार मोठे स्थान आहे. अनेक प्राचीन राज्ये आणि त्यांचे राजे गरुडाची पूजा करत असत. हिंदुस्थानात गरुडाच्या अनेक मूर्ती आढळून येतात. बघायला गेलं तर अनेक ठिकाणी गरुडाची मूर्ति अर्धमानवी आणि अर्धपक्षी स्वरूपात आढळतात. काही मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहेत तर काही उभ्या. महाराष्ट्रात वैष्णव परंपरेत तयार केलेल्या गरुडाच्या मूर्ती या दोन हातांच्या असून त्या सदैव हात जोडलेल्या स्थितीत म्हणजेच ' अंजली ' मुद्रेत असतात. बरयाच वेळा काही काही गरुडमूर्तीना चार हातसुद्धा असतात, ज्याला ‘ वैनतेय ’ म्हणतात. काही गरुड मूर्ती एक गुडघा टेकवून बसलेल्या स्थितीत पण असतात, जिथे एका हातात सर्प तर दुसर्‍या हातात सस्त्र असते. ' गुरुमादाय उड्डीनः इति गरुड ' - म्हणजेच जड वस्तू उचलून उडणारा असा तो गरुड असे गरुडाचे वर्णन